Saturday 15 December 2018

परमवीर चक्र विजेत्यांची शौर्य गाथा

मित्रांनो मी ब्रिगेडियर अनिल तळवलकर (निवृत्त) सेना मेडल यांचे परमवीर चक्र विजेत्यांच्या शौर्यकथा हे पुस्तक वाचले त्यात त्यांनी परमवीर चक्र विजेत्यांच्या विरकथा शालेय अभ्यास क्रमात नाही. आणि शाळा संपल्यानंतर बहुसंख्य नागरिकांचा  इतिहासाशी संबंध येतच नहीं. त्यामुळे आपल्या सैन्यतील वीरानी केलेल्या अतुलनीय कामगिरी बद्दल आपल्या समाजाला काहीच माहिती नहीं. आपल्या समाजातील ही त्रुटि अंशात: का होईना दूर करने गरजेचे आहे. असे त्यांच्या मनोगतात लिहिले. आणि हे खरोखर सत्य आहे.
         यासाठी आपणाला एकत्रित येऊन हे कार्य करावे लागेल त्या साठी प्रत्येक शाळेत जाऊन विरांची विरगाता शाळकरी मुलांना समजवावि लागेल. त्यामुळे स्वतंत्रयप्राप्तिनंतरचा इतिहास या देशातील नविन पिढीच्या मनात घर करुन जाईल तेव्हा आपन खरे सैनिक आहो. आपन देशासाठी काय केले , हे या जगाला कळेल आणि यामुळे परमवीर चक्र विजेता लान्स नायक करम सिंग सारख्या वीर योध्याला ,त्याच्या कुटुंबाला न्याय मिळेल.
       मित्रांनो आपल्या देशात शोकांतिका आशी परमवीर चक्र विजेता लान्स नायक करम सिंग या महान योध्याच्या घरीची स्तिथि अतिशय बिकट आहे. त्यामुळे त्यांच्या 21 वर्ष्याच्या सतनामसिंग या नतवाने त्यांना मिळालेल्या भारताच्या सर्वोच्च शोर्यपदकाचा लिलाव करण्याचे ठरविले आहे. कारण मागील 50 वर्ष, पंजाब सरकार, तसेच केंद्र सरकारने परमवीर चक्र विजेत्या ना लागु असलेले उदाहरणार्थ पेट्रोल पंप, जमीन व इतर फायदे त्यांना दिले नाहीत. ही दुःखाचीच गोष्ट नव्हे तर पूर्ण देशाला काळीमा फासणारी गोष्ट आहे. तसेच हे उदाहरण कही एका सैनिकाच्या बबतीतील नहीं तर कितीतरी सैनिकाना आपल्या देशातील एकाच खुर्चीवर बसून पूर्ण जीवन व्यतीत करणाऱ्या बाबू लोकांनी खोटी नाटी नियम व कारणे दाखवून, त्यांनी अतिशय काष्ठाने मिळविलेल्या सोयी सुविधा नकरलेल्या आहेत.
   जय हिन्द ।
बिपिन मोघे
अध्यक्ष
जयहिंद फाउंडेशन महाराष्ट्र राज्य
शाखा वर्धा

No comments:

Post a Comment

डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे

स्मरण : एक प्रेरणादायी प्रवास डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे सारे आयुष्यच विस्मयकारी घटनांनी भरलेले आहे. गदर क्रांतीचे प्रणेत...