Wednesday 27 November 2019

फक्त जयहिंद बोललं म्हणजे झाले का?

*फक्त जयहिंद बोललं म्हणजे झालं का* ? 🇮🇳

जयहिंद मित्रांनो जयहिंद,
मित्रांनो किती साधा आणि सोपा शब्द आहे हा बोलायला, आपण सहज बोलतो जयहिंद, जे लोक जयहिंद बोलत नाहीत त्यांच्या विषयी काही बोलायचे नाही.परंतु जे जयहिंद बोलतात त्यांच्याशी थोडं हितगुज.
मित्रांनो जयहिंद या शब्दाची फोड केली तर जय आणि हिंद अशी होईल, म्हणजेच आपल्या देशाचा विजय आहे किंवा असो. आपण सर्वजण या देशाचे सुजाण नागरीक आहोत, ज्या मातृ-भूमीतआम्ही जन्म घेतला, आणि शिक्षणाला सुरवात केली तेव्हा पासूनच आपण प्रतिज्ञा घेतो कि भारत माझा देश आहे,या देशातील सारे भारतीय माझे बंधू आणि भगिनी आहेत आणि या देशावर माझे प्रेम आहे.

मित्रांनो ज्या देशात आपण राहतो तो देश आपलाच आहे, यात दुमत नाही, परंतु सारे भारतीय आपले बंधू आहेत भगिनी आहेत का ? हा प्रश्न आपण एकदा प्रामाणिक पणे स्वतःला विचारणे गरजेचे आहे. आज आपल्याला फक्त आपल्या सैनिक बांधवाच्या विषयीचं बोलायाचं आहे. आज आपण सगळेच सोशल माध्यमातून एक दुसऱ्यांशी सतत संपर्कात असतो. त्यामुळे देशाच्या सीमेवर आपले सैनिक बांधव कसे आहेत किंवा ते कशा प्रतिकूल परिस्तीथीशी सामना करत आपल्या देशाचे आणि आपले संरक्षण करत आहेत हे आपल्याला समजत असतं. अगदी तसेच जर शत्रूने हल्ला केला तर तो परतवण्यासाठी आपल्या जीवाची
बाजी लावून शत्रूशी लढता लढता प्रसंगी शहीद झालेल्या आपल्या बांधवांच्या बाबतीत देखील आपल्याला लगेच समजत असतं. अशी दुःखाची बातमी समजलीरे समजली  की एक भारतीय नागरिक म्हणून आपण सगळे सर्वप्रथम काय करतो तर, सोशल माध्यमातून "भावपूर्ण श्रध्दांजली" हे दोन शब्द लिहिले आणि पुढे पाठवले की एक भारतीय नागरिक म्हणून आपल्या सैनिक बांधवा बद्दलची आपली जबाबदारीची बांधिलकी संपवतो.

मित्रांनो थोडा विचार करा, आपल्या या दोन शब्दात संपेल एवढचं त्या आपल्या सैनिकांच्या बलीदानाच योगदान आहे का ? तर नक्कीच नाही.मित्रांनो आपण सगळेच आप आपल्या क्षेत्रात, कामात व्यस्त आहात आणि असायला ही हवं कारण आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे, अगदी तसंच आपल्या देशाच्या रक्षणाच्या जबाबदारीसाठी खांद्यावर बंदूक घेऊन आपले सैनिक बांधव सीमेवर २४ तास अविरत पहारा देत आहेत म्हणून आपण इथे आपल्या कुटुंबा बरोबर आनंदात राहतो आहोत. परंतु या देश रक्षणा करता प्रसंगी शहिद झालेल्या आपल्या सैनिक बांधवाच्या;कुटुंबाच्या आनंदाच काय ? हा प्रश्न आपल्याला पडतो का ? आणि जर पडला तर आपण तो सोडवतो का ?

मित्रांनो नुकताच आनंदाचा दिवाळी सण संपला आपण प्रत्येकाने तो आपल्या कुटुंबाबरोबर मोठ्या आनंदाने साजरा केला, कुणी कुटुंबा  बरोबर मित्र परिवाराबरोबर सहलींचा आनंद घेतला , कुणी सिनेमांचा आनंद घेतला, कुणी पै पाहुण्यांचा भेटीचा आनंद घेतला तर कुणी देव दर्शनाचा आनंद घेतला तर कुणी दिवाळी सुट्टीत आरामाचा आनंद घेतला. मित्रांनो याचं दिवाळी सणा दरम्यान
हिंदी चित्रपट सृष्टीतील सामाजिक भान असणारा कलाकार अक्षय कुमार याने आपल्या दिवाळीच्या सणाचा आनंद हा शहीद झालेल्या कुटुंबाना आर्थिक मदत देऊन साजरा केला. ही बातमी आपण सर्वांनी सोशल माध्यमातून एक दुसऱ्यांना पाठवली, परंतु पुढे पाठवण्याच्या अगोदर आपल्या मनात विचार आला का ? अरे अक्षय कुमार जर हे करतो आहे तर मग आपण देखील थोडा तरी खारीचा वाटा का बरं उचलू नये ?

परंतु तसं न होता ती बातमी सोशल माध्यमातून फक्त पुढे पाठवली, म्हणजे मी माझे देशप्रेम आणि देशभक्ती सिद्ध केली, आणि आपली आपल्या सैनिक बांधवाच्या कुटुंबाप्रती असलेली नैतिक आणि राष्ट्रीय जबाबदारी संपली. आहो अक्षय कुमार, नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे हि आणि असे अनेक लोकं हे आपल्या शहीद सैनीक कुटुंबासाठी, समाजासाठी, देशासाठी खूप काही करत आहेत,
त्यांनी केलेल्या देश भक्तीच्या, देश सेवेच्या बातम्या फक्त सोशल माध्यमातून पुढे पाठवताना आपल्याला देखील आपल्या सामाजिक जबाबदारीची,सामाजिक बांधिलकीची जाणीव व्हायला हवी नाही का ? वि. दा. करंदीकर यांचा एक सुंदर विचार इथे मुद्दाम सांगावासा वाटतो, देणाऱ्याने देतं जावे, घेणाऱ्याने घेतं जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. तर मित्रांनो चला आपण अक्षय कुमार, नाना पाटेकर यांचे आणि त्यांच्या सारख्या अनेक सामाजिक संस्थेचे जे सैनिकांसाठी जे कार्य चालू आहे त्याचा एक भाग होऊ या आणि आपलं राष्ट्रीय कर्तव्य पार पडू या.       

मित्रांनो हा पत्र प्रपंच हा एवढ्याच साठी की हा देश, ही भारत भुमी माझी आहे आणि या भुमीच रक्षण करणारा माझा रक्ताचा नसला तरी माझा बांधव आहे,त्याचा त्याग हा देशासाठीचा सर्वोच्च त्याग आहे, त्याच्या पाठी मागे त्याच्या कुटुंबाची जबाबदारी माझी देखील आहे, याची जाणीव व्हायला हवी.तेव्हा मित्रांनो फक्त जयहिंद बोलून जमणार नाही, फक्त श्रध्दांजली वाहून जमणार नाही, तर या जयहिंद साठी लढणाऱ्या कुटुंबाच्यामागे खंभीर उभं राहिलं पाहिजे, हो ना ? आता ते कसं उभं राहायचं हे आपण ठरवायचं आहे.बाकी आपण ज्ञाते आणि सर्वश्रुत आहातच.

लक्षात ठेवा देहाकडून देवाकडे जाताना जो देश लागतो, ज्या देशात मी राहतो, ज्या देशाचं मी काहीतरी देणं लागतो, ज्या देशावर प्रेम आहे. त्या साठी नुसत जयहिंद बोलुन चालणार नाही तर आपल्या कृतीतुन पण दीसुन आले पाहीजे.

*जयहिंद*
*भारत माता कि जय*

Wednesday 1 May 2019

*मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा* 🚩🇮🇳 जयहिंद मित्रांनो जयहिंद, आज ०१ मे अर्थात महाराष्ट्र दिन , या दिवसाची महती, महत्व आणि माहिती आपल्या सर्वांना असणारच यात दुमत नाही.... या महा - राष्ट्रच्या निर्मिती साठी अनेकांनी आपले प्राण वाहिले आणि या महान अर्थात महा राष्ट्राची निर्मिती झाली.... आणि पुढे अनेकांनी या महाराष्ट्राला महान करण्यासाठी आपले आयुष्य वेचले, कोणी आबाद होऊन तर कोणी नाबाद राहून आपल्या महाराष्ट्रला घडवलं आणि देशातच नव्हे तर जगात एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. मित्रांनो ईतिहास साक्षी आहे, देशाच्या प्रतिकूल परिस्तिथी मध्ये देशाला दिशा देण्याचं काम हे, एक पाऊल पुढे टाकत, या महाराष्ट्राने नेहमीचं केलं होत, आज हि करत आहे, आणि उद्या हि करत राहणार आहे... *कारण हा महाराष्ट्र आहे कणखर मनांचा, निधड्या छातीचा, आणि शूर वीरांचा...*. आज देखील या अखंड महाराष्ट्राच्याचं नव्हे तर अजिंक्य भारतासाठी महाराष्ट्रतून आपले अनेक शूर मावळे भारतीय संरक्षण दलात, आपल्या जीवाची पर्वा न करता आपली बहादुरी आणि शूरगिरी गाजवत आहेत...अशा या शूर, बहादूर आणि जिगरबाज सैनिकांना आजच्या महाराष्ट्र दिनी, जयहिंद फाऊंडेशनचा मानाचा मुजरा.... *मित्रांनो आपल्या या महा-राष्ट्रातील अशाच १४ जवानांनी आपल्या जीवाची तर सोडाच पण त्यांच्यावर ज्यांचा जीव आहे ते माता पिता, धर्मपत्नी आणि ती छकुली आणि छकुला यांचा देखील विचार न करता आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्या १४ हुतात्मा जवानांच्या कुटुंबाचा सन्मान सोहळा रविवार दिनांक ०५ मे २०१९ रोजी सकाळी ९ वाजता , वासुदेव बळवंत फडके सभागृह, पनवेल येथे आयोजित केला आहे....* *तेव्हा मित्रांनो या खऱ्या खुऱ्या बाजीगारांच्या कर्तृत्वाची आणि आपल्या देशाच्या खऱ्या हिरोंच्या बलिदानाची,त्यागाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, तमाम महाराष्ट्र वासीयांना आजच्या या पवित्र महाराष्ट्र दिनी जयहिंद फाऊंडेशन आपल्याला आग्रहाचे निमंत्रण देत आहे. आणि आपण सगळे नक्की येणार आहात कारण हा महाराष्ट्र माझा आहे आणि मी या महाराष्ट्राचा आहे आणि म्हणूनच मी, तुम्ही आणि आपण सर्व एका सुरात सूर मिळऊन म्हणणार आहोत.* *जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा.* जयहिंद फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य, (सैनिक हो तुमच्यासाठी) अध्यक्ष वर्धा जिल्हा बिपीन मोघे 9421726268

Wednesday 17 April 2019

सैनिक हो तुमच्या साठी।

*फक्त जयहिंद बोललं म्हणजे झालं का* ? 🇮🇳

जयहिंद मित्रांनो जयहिंद,
मित्रांनो किती साधा आणि सोपा शब्द आहे हा बोलायला, आपण सहज बोलतो जयहिंद, जे लोक जयहिंद बोलत नाहीत त्यांच्या विषयी काही बोलायचे नाही.परंतु जे जयहिंद बोलतात त्यांच्याशी थोडं हितगुज.
मित्रांनो जयहिंद या शब्दाची फोड केली तर जय आणि हिंद अशी होईल, म्हणजेच आपल्या देशाचा विजय आहे किंवा असो. आपण सर्वजण या देशाचे सुजाण नागरीक आहोत, ज्या मातृ-भूमीतआम्ही जन्म घेतला, आणि शिक्षणाला सुरवात केली तेव्हा पासूनच आपण प्रतिज्ञा घेतो कि भारत माझा देश आहे,या देशातील सारे भारतीय माझे बंधू आणि भगिनी आहेत आणि या देशावर माझे प्रेम आहे.

मित्रांनो ज्या देशात आपण राहतो तो देश आपलाच आहे, यात दुमत नाही, परंतु सारे भारतीय आपले बंधू आहेत भगिनी आहेत का ? हा प्रश्न आपण एकदा प्रामाणिक पणे स्वतःला विचारणे गरजेचे आहे. आज आपल्याला फक्त आपल्या सैनिक बांधवाच्या विषयीचं बोलायाचं आहे. आज आपण सगळेच सोशल माध्यमातून एक दुसऱ्यांशी सतत संपर्कात असतो. त्यामुळे देशाच्या सीमेवर आपले सैनिक बांधव कसे आहेत किंवा ते कशा प्रतिकूल परिस्तीथीशी सामना करत आपल्या देशाचे आणि आपले संरक्षण करत आहेत हे आपल्याला समजत असतं. अगदी तसेच जर शत्रूने हल्ला केला तर तो परतवण्यासाठी आपल्या जीवाची
बाजी लावून शत्रूशी लढता लढता प्रसंगी शहीद झालेल्या आपल्या बांधवांच्या बाबतीत देखील आपल्याला लगेच समजत असतं. अशी दुःखाची बातमी समजलीरे समजली  की एक भारतीय नागरिक म्हणून आपण सगळे सर्वप्रथम काय करतो तर, सोशल माध्यमातून "भावपूर्ण श्रध्दांजली" हे दोन शब्द लिहिले आणि पुढे पाठवले की एक भारतीय नागरिक म्हणून आपल्या सैनिक बांधवा बद्दलची आपली जबाबदारीची बांधिलकी संपवतो.

मित्रांनो थोडा विचार करा, आपल्या या दोन शब्दात संपेल एवढचं त्या आपल्या सैनिकांच्या बलीदानाच योगदान आहे का ? तर नक्कीच नाही.मित्रांनो आपण सगळेच आप आपल्या क्षेत्रात, कामात व्यस्त आहात आणि असायला ही हवं कारण आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे, अगदी तसंच आपल्या देशाच्या रक्षणाच्या जबाबदारीसाठी खांद्यावर बंदूक घेऊन आपले सैनिक बांधव सीमेवर २४ तास अविरत पहारा देत आहेत म्हणून आपण इथे आपल्या कुटुंबा बरोबर आनंदात राहतो आहोत. परंतु या देश रक्षणा करता प्रसंगी शहिद झालेल्या आपल्या सैनिक बांधवाच्या;कुटुंबाच्या आनंदाच काय ? हा प्रश्न आपल्याला पडतो का ? आणि जर पडला तर आपण तो सोडवतो का ?

मित्रांनो नुकताच आनंदाचा दिवाळी सण संपला आपण प्रत्येकाने तो आपल्या कुटुंबाबरोबर मोठ्या आनंदाने साजरा केला, कुणी कुटुंबा  बरोबर मित्र परिवाराबरोबर सहलींचा आनंद घेतला , कुणी सिनेमांचा आनंद घेतला, कुणी पै पाहुण्यांचा भेटीचा आनंद घेतला तर कुणी देव दर्शनाचा आनंद घेतला तर कुणी दिवाळी सुट्टीत आरामाचा आनंद घेतला. मित्रांनो याचं दिवाळी सणा दरम्यान
हिंदी चित्रपट सृष्टीतील सामाजिक भान असणारा कलाकार अक्षय कुमार याने आपल्या दिवाळीच्या सणाचा आनंद हा शहीद झालेल्या कुटुंबाना आर्थिक मदत देऊन साजरा केला. ही बातमी आपण सर्वांनी सोशल माध्यमातून एक दुसऱ्यांना पाठवली, परंतु पुढे पाठवण्याच्या अगोदर आपल्या मनात विचार आला का ? अरे अक्षय कुमार जर हे करतो आहे तर मग आपण देखील थोडा तरी खारीचा वाटा का बरं उचलू नये ?

परंतु तसं न होता ती बातमी सोशल माध्यमातून फक्त पुढे पाठवली, म्हणजे मी माझे देशप्रेम आणि देशभक्ती सिद्ध केली, आणि आपली आपल्या सैनिक बांधवाच्या कुटुंबाप्रती असलेली नैतिक आणि राष्ट्रीय जबाबदारी संपली. आहो अक्षय कुमार, नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे हि आणि असे अनेक लोकं हे आपल्या शहीद सैनीक कुटुंबासाठी, समाजासाठी, देशासाठी खूप काही करत आहेत,
त्यांनी केलेल्या देश भक्तीच्या, देश सेवेच्या बातम्या फक्त सोशल माध्यमातून पुढे पाठवताना आपल्याला देखील आपल्या सामाजिक जबाबदारीची,सामाजिक बांधिलकीची जाणीव व्हायला हवी नाही का ? वि. दा. करंदीकर यांचा एक सुंदर विचार इथे मुद्दाम सांगावासा वाटतो, देणाऱ्याने देतं जावे, घेणाऱ्याने घेतं जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. तर मित्रांनो चला आपण अक्षय कुमार, नाना पाटेकर यांचे आणि त्यांच्या सारख्या अनेक सामाजिक संस्थेचे जे सैनिकांसाठी जे कार्य चालू आहे त्याचा एक भाग होऊ या आणि आपलं राष्ट्रीय कर्तव्य पार पडू या.       

मित्रांनो हा पत्र प्रपंच हा एवढ्याच साठी की हा देश, ही भारत भुमी माझी आहे आणि या भुमीच रक्षण करणारा माझा रक्ताचा नसला तरी माझा बांधव आहे,त्याचा त्याग हा देशासाठीचा सर्वोच्च त्याग आहे, त्याच्या पाठी मागे त्याच्या कुटुंबाची जबाबदारी माझी देखील आहे, याची जाणीव व्हायला हवी.तेव्हा मित्रांनो फक्त जयहिंद बोलून जमणार नाही, फक्त श्रध्दांजली वाहून जमणार नाही, तर या जयहिंद साठी लढणाऱ्या कुटुंबाच्यामागे खंभीर उभं राहिलं पाहिजे, हो ना ? आता ते कसं उभं राहायचं हे आपण ठरवायचं आहे.बाकी आपण ज्ञाते आणि सर्वश्रुत आहातच.

लक्षात ठेवा देहाकडून देवाकडे जाताना जो देश लागतो, ज्या देशात मी राहतो, ज्या देशाचं मी काहीतरी देणं लागतो, ज्या देशावर प्रेम आहे. त्या साठी नुसत जयहिंद बोलुन चालणार नाही तर आपल्या कृतीतुन पण दीसुन आले पाहीजे.

जयहिंद,
भारत माता कि जय,

जयहिंद फौंडेशन।
(सैनिक हो तुमच्यासाठी)

अध्यक्ष
जयहिंद फाउंडेशन,
शाखा वर्धा
: श्री बिपीन मोघे
9421726268/ 7350278141

Saturday 9 March 2019

मेरा देश सर्व प्रथम

हम तो आज मे जिते है। और जो गलत है ऊसे गलत ही कहते है। क्योकी हम खुद्द को मानते है। किसीं और का थोपा हुवा नही। जीस दिन मोदी की बातें हमे बुरी लगे ऊस दिन हम आप से सला लेणे नही , खुद्द का निर्णय लेंगे। क्योनकी हमारे दिल मे कोई एक धर्म, या पंथ, या पक्ष, या पार्टी नही बसती और नाही हमे इसकी कभी जरूरत पढी है। और नाही पढेगी क्योनकी हमारे दिल मे देश बसता है। धर्म नही। धर्म का प्रचार या धर्म की राजनीती की जरूरत उन्हे होती है। जिन्हे उनके धर्म मे कमी नजर आती हो और प्रचार करणा उनकी मजबुरी समजते है। हम तो सभी धर्म को मानते है। इस लीये हमे इसकी जरूरत नही होती।
।।जयहिंद।।
।।जय भारत।।
बिपीन मोघे
(एक सैनिक)

Tuesday 19 February 2019

श्रद्धांजली

सुधा_मूर्ती_यांचा निशब्द करणारा एक लेख....
*नक्की वाचा, नक्कीच  काही तरी नवीन शिकायला मिळेल.*

त्या रशिया मध्ये असताना एका पार्क मध्ये फिरायला गेल्या होत्या. रविवार.. त्यात थोडा पाऊस आणि थंडी.. नुकतेच लग्न झालेले एक जोडपे तिथे फोटो काढून घेत होते. ब्लाँड, घाऱ्या निळ्या डोळ्यांची पंचविशीतली सुंदर मुलगी आणि तिच्याच वयाचा तितकाच हँडसम मुलगा.. मुलीने अतिशय देखणा व्हाइट वेडिंग गाऊन घातला होता पण मुलाने मात्र मिलिटरी युनिफॉर्म..

त्यांचे फोटो काढून झाल्यावर तिथेच असलेल्या वॉर मेमोरिअल पाशी ते गेले आणि हातातला बुके तिथे ठेऊन दोघांनी मान झुकवून वंदन केले. हे सगळे पहात असलेल्या सुधा मूर्तींच्या मनात अनेक प्रश्नांनी गर्दी केली होती.. तितक्यात तिथेच बाजूला उभ्या असलेल्या एका वयस्कर माणसाने त्यांची साडी पाहून विचारले "तुम्ही भारतिय का?" हो असे उत्तर देऊन त्यांच्या गप्पांना सुरुवात झाली. त्या माणसाने परदेशात काम केले असल्याने इंग्लिश मध्ये बोलणे सोप्पे झाले. जरा उत्सुकतेने मूर्तींनी विचारले हे दोघे इथे येऊन नमस्कार का करून गेले? त्यावर त्या माणसाने सांगितले "रशिया मधे लग्न झाल्यावर त्या जोडप्याने कोणत्याही एका राष्ट्रीय स्मारकाला भेट द्यायची पद्धत आहे. नवरा मुलगा लग्नात केवळ मिलिटरी युनिफॉर्मच घालतो. प्रत्येक तरुण मुलाला (समाजातील सगळया स्तरातल्या) काही वर्षे आर्मी जॉईन करावी लागते. तरुण पिढीला हे लक्षात राहावे की आपल्या आधीच्या पिढीने त्यांचे आयुष्य देशासाठी अर्पण केले, रशियने अनेक लढाया लढल्या, त्यातल्या काही जिंकल्या, काही हरल्या पण जे युद्धात मारले गेले त्यांचा त्याग विसरला गेला नाही पाहिजे. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांच्या हे कायम लक्षात राहिले पाहिजे की ते ज्या स्वतंत्र, शांततापूर्ण रशिया मध्ये रहात आहेत ही या युद्धात शहीद झालेल्यांची देण आहे. आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्यात आनंदाच्या क्षणी या शहिदांना विसरता कामा नये.. त्यांच्या पुढच्या पिढीला सुद्धा याची जाणीव त्यांनी करून दिली पाहिजे.. देशाप्रती प्रेम हे लग्नाच्या सेलिब्रेशन पेक्षा जास्त महत्त्वाचे आहे.. "

किती मोठा विचार आहे हा.. आपल्या डोक्यात का नाही येत या गोष्टी?? का नाही थोडीही कृतज्ञता दाखवत आपण आपल्या जवानां साठी?? का आपल्या विचारांमधे, कृतींमध्ये यांचे समर्पण नसते?? भारत इंग्रजांच्या तावडीतून स्वतंत्र झाला हे सोडून आणि इतिहासातले धडे सोडले तर आजच्या नवीन पिढीला किती क्रांतिकारकांची नावे माहित आहेत?? आपल्या पाल्याला हे सगळे माहित पाहिजे, त्याच्या मनात देशाविषयी, आपल्या सैन्याविषयी प्रेम, आदर हा असलाच पाहिजे आणि त्यासाठी पोषक वातावरण देणे ही किती पालकांना त्यांची जबाबदारी वाटते?? किती शाळांमध्ये इतिहास हा नवीन  सक्षम पिढी घडवण्यासाठी शिकवला जातो??

सीमेवर हल्ले तर होतच राहतात, आपले जवान शहीद होतच राहतात म्हणून आपण सोयीस्कर पणे दुर्लक्ष करत रहाणार.. चर्चा, महाचर्चा घडत रहाणार, अपोझिशन वाले आणि सत्तेत असणारे एसी ऑफिस मध्ये बसून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यातच धन्यता मानणार, शहिदांच्या कुटुंबीयांना निधी जाहीर होणार, दोन चार नेते त्यांना भेटणार त्याचे फोटो पेपर मध्ये छापुन येणार आणि आपण चोवीस तासांच्या आत सगळे विसरून जाणार..

सो कॉल्ड वॅलेंटांईंस डे साजरा करून झाल्यावर आता आजही शहीद झालेल्या आपल्या जवानांना कोरडी श्रद्धांजली वाहण्यापलिकडे आपण करणार तरी काय आहोत अजून..??!!

।।जयहिंद।।

डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे

स्मरण : एक प्रेरणादायी प्रवास डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे सारे आयुष्यच विस्मयकारी घटनांनी भरलेले आहे. गदर क्रांतीचे प्रणेत...