Monday, 1 July 2024

फक्त जयहिंद बोललं म्हणजे झाले का?

*फक्त जयहिंद बोललं म्हणजे झालं का* ? 🇮🇳

जयहिंद मित्रांनो जयहिंद,
मित्रांनो किती साधा आणि सोपा शब्द आहे हा बोलायला, आपण सहज बोलतो जयहिंद, जे लोक जयहिंद बोलत नाहीत त्यांच्या विषयी काही बोलायचे नाही.परंतु जे जयहिंद बोलतात त्यांच्याशी थोडं हितगुज.
मित्रांनो जयहिंद या शब्दाची फोड केली तर जय आणि हिंद अशी होईल, म्हणजेच आपल्या देशाचा विजय आहे किंवा असो. आपण सर्वजण या देशाचे सुजाण नागरीक आहोत, ज्या मातृ-भूमीतआम्ही जन्म घेतला, आणि शिक्षणाला सुरवात केली तेव्हा पासूनच आपण प्रतिज्ञा घेतो कि भारत माझा देश आहे,या देशातील सारे भारतीय माझे बंधू आणि भगिनी आहेत आणि या देशावर माझे प्रेम आहे.

मित्रांनो ज्या देशात आपण राहतो तो देश आपलाच आहे, यात दुमत नाही, परंतु सारे भारतीय आपले बंधू आहेत भगिनी आहेत का ? हा प्रश्न आपण एकदा प्रामाणिक पणे स्वतःला विचारणे गरजेचे आहे. आज आपल्याला फक्त आपल्या सैनिक बांधवाच्या विषयीचं बोलायाचं आहे. आज आपण सगळेच सोशल माध्यमातून एक दुसऱ्यांशी सतत संपर्कात असतो. त्यामुळे देशाच्या सीमेवर आपले सैनिक बांधव कसे आहेत किंवा ते कशा प्रतिकूल परिस्तीथीशी सामना करत आपल्या देशाचे आणि आपले संरक्षण करत आहेत हे आपल्याला समजत असतं. अगदी तसेच जर शत्रूने हल्ला केला तर तो परतवण्यासाठी आपल्या जीवाची
बाजी लावून शत्रूशी लढता लढता प्रसंगी शहीद झालेल्या आपल्या बांधवांच्या बाबतीत देखील आपल्याला लगेच समजत असतं. अशी दुःखाची बातमी समजलीरे समजली  की एक भारतीय नागरिक म्हणून आपण सगळे सर्वप्रथम काय करतो तर, सोशल माध्यमातून "भावपूर्ण श्रध्दांजली" हे दोन शब्द लिहिले आणि पुढे पाठवले की एक भारतीय नागरिक म्हणून आपल्या सैनिक बांधवा बद्दलची आपली जबाबदारीची बांधिलकी संपवतो.

मित्रांनो थोडा विचार करा, आपल्या या दोन शब्दात संपेल एवढचं त्या आपल्या सैनिकांच्या बलीदानाच योगदान आहे का ? तर नक्कीच नाही.मित्रांनो आपण सगळेच आप आपल्या क्षेत्रात, कामात व्यस्त आहात आणि असायला ही हवं कारण आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे, अगदी तसंच आपल्या देशाच्या रक्षणाच्या जबाबदारीसाठी खांद्यावर बंदूक घेऊन आपले सैनिक बांधव सीमेवर २४ तास अविरत पहारा देत आहेत म्हणून आपण इथे आपल्या कुटुंबा बरोबर आनंदात राहतो आहोत. परंतु या देश रक्षणा करता प्रसंगी शहिद झालेल्या आपल्या सैनिक बांधवाच्या;कुटुंबाच्या आनंदाच काय ? हा प्रश्न आपल्याला पडतो का ? आणि जर पडला तर आपण तो सोडवतो का ?

मित्रांनो नुकताच आनंदाचा दिवाळी सण संपला आपण प्रत्येकाने तो आपल्या कुटुंबाबरोबर मोठ्या आनंदाने साजरा केला, कुणी कुटुंबा  बरोबर मित्र परिवाराबरोबर सहलींचा आनंद घेतला , कुणी सिनेमांचा आनंद घेतला, कुणी पै पाहुण्यांचा भेटीचा आनंद घेतला तर कुणी देव दर्शनाचा आनंद घेतला तर कुणी दिवाळी सुट्टीत आरामाचा आनंद घेतला. मित्रांनो याचं दिवाळी सणा दरम्यान
हिंदी चित्रपट सृष्टीतील सामाजिक भान असणारा कलाकार अक्षय कुमार याने आपल्या दिवाळीच्या सणाचा आनंद हा शहीद झालेल्या कुटुंबाना आर्थिक मदत देऊन साजरा केला. ही बातमी आपण सर्वांनी सोशल माध्यमातून एक दुसऱ्यांना पाठवली, परंतु पुढे पाठवण्याच्या अगोदर आपल्या मनात विचार आला का ? अरे अक्षय कुमार जर हे करतो आहे तर मग आपण देखील थोडा तरी खारीचा वाटा का बरं उचलू नये ?

परंतु तसं न होता ती बातमी सोशल माध्यमातून फक्त पुढे पाठवली, म्हणजे मी माझे देशप्रेम आणि देशभक्ती सिद्ध केली, आणि आपली आपल्या सैनिक बांधवाच्या कुटुंबाप्रती असलेली नैतिक आणि राष्ट्रीय जबाबदारी संपली. आहो अक्षय कुमार, नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे हि आणि असे अनेक लोकं हे आपल्या शहीद सैनीक कुटुंबासाठी, समाजासाठी, देशासाठी खूप काही करत आहेत,
त्यांनी केलेल्या देश भक्तीच्या, देश सेवेच्या बातम्या फक्त सोशल माध्यमातून पुढे पाठवताना आपल्याला देखील आपल्या सामाजिक जबाबदारीची,सामाजिक बांधिलकीची जाणीव व्हायला हवी नाही का ? वि. दा. करंदीकर यांचा एक सुंदर विचार इथे मुद्दाम सांगावासा वाटतो, देणाऱ्याने देतं जावे, घेणाऱ्याने घेतं जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. तर मित्रांनो चला आपण अक्षय कुमार, नाना पाटेकर यांचे आणि त्यांच्या सारख्या अनेक सामाजिक संस्थेचे जे सैनिकांसाठी जे कार्य चालू आहे त्याचा एक भाग होऊ या आणि आपलं राष्ट्रीय कर्तव्य पार पडू या.       

मित्रांनो हा पत्र प्रपंच हा एवढ्याच साठी की हा देश, ही भारत भुमी माझी आहे आणि या भुमीच रक्षण करणारा माझा रक्ताचा नसला तरी माझा बांधव आहे,त्याचा त्याग हा देशासाठीचा सर्वोच्च त्याग आहे, त्याच्या पाठी मागे त्याच्या कुटुंबाची जबाबदारी माझी देखील आहे, याची जाणीव व्हायला हवी.तेव्हा मित्रांनो फक्त जयहिंद बोलून जमणार नाही, फक्त श्रध्दांजली वाहून जमणार नाही, तर या जयहिंद साठी लढणाऱ्या कुटुंबाच्यामागे खंभीर उभं राहिलं पाहिजे, हो ना ? आता ते कसं उभं राहायचं हे आपण ठरवायचं आहे.बाकी आपण ज्ञाते आणि सर्वश्रुत आहातच.

लक्षात ठेवा देहाकडून देवाकडे जाताना जो देश लागतो, ज्या देशात मी राहतो, ज्या देशाचं मी काहीतरी देणं लागतो, ज्या देशावर प्रेम आहे. त्या साठी नुसत जयहिंद बोलुन चालणार नाही तर आपल्या कृतीतुन पण दीसुन आले पाहीजे.

*जयहिंद*
*भारत माता कि जय*

New Law From 01Ju l3024

New law from 1 July 2024

*IPC (Indian Penal Code) will now have to be written as BNS (Bhartiya nyaay sahinta,)*

*Cr.PC (Code of Criminal Procedure) will have to be written as BNSS (Bhartiya Nagrik Suraksha Sanhita ),*

Every day we have to mention many sections in criminal cases in front of the court, which we usually remember, since now due to the change in the law we will have to remember new sections,,, let's know about some such sections----
*Cr.PC -------- BNSS*
*(Sections requiring attendance exemption)*
115 ----------- 134
205 ----------- 228
317 ----------- 355
256 ---------- 279
-------------------------------------
*Sections requiring bail*
*(BNSS)*
436 ------- 480
437 -------  482
438 ------- 484
439 ------- 485
-----------------------------------
*Sections related to maintenance* 
*(BNSS)*
125 ---------- 144
127 ---------- 146
128 ----------- 147
------------------------------------ 
*Sections related to compromise*
*(BNSS)*
320 ----------- 359
------------------------------------
*FIR related sections*
*(BNSS)*
154 -------- 173
155 -------- 174
-----------------------------------
*Sections which are used in SDM court*---
*BNSS*
41 ----- 35
97 ----- 100
98 ------ 101
107 ------ 126
109 ------ 128
 110 ------ 129

133 -------152

144 -------163

145 -------164

151--------170
------------------------------------

*Sections of surrender deed*

*(BNSS)*

451 ------- 499

457 ------- 505
==================

*Sections of Indian Judicial Code* ------

*IPC ---------- BNS*

302 ----- 103

307 ----- 109

304-A ---- 106

304-B ​​----- 80

306 ------ 108

376 ------ 64

354 ------ 74

294 ------ 296

323 -------  115
324, 326 ------- 118
325 --------- 117
506- B ---- 351(3)
507 ------ 351(4)
279 ------- 281
337 ---- 125, 125A
338 ----- 125B
363 ----- 137
366 ------ 138
379 ------ 303
380 ------ 305
New ---- 304 snatching
397 ------ 309 robbery
398 ------ 310 dacoity
392 ------ 307(2)
394 ------- 307(4)
395 ------- 308(2)
396  ------ 308(3)

451 ------ 330(c)

452 -------- 331

499, 500 -------- 356

510 ------- 355

146 ------ 191 Riot

159 ------ 194 Riot

383 ------- 308 Extortion

---- 314 Misappropriation

405---- 316 Breach of trust

467 ----- 336 Forgery

411 ------ 315(2)

==================


Tuesday, 18 October 2022

डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे



स्मरण : एक प्रेरणादायी प्रवास
डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे सारे आयुष्यच विस्मयकारी घटनांनी भरलेले आहे.
गदर क्रांतीचे प्रणेते ते मेक्सिकोच्या शेतीतले जादूगार असा भन्नाट प्रवास करणाऱ्या डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे सारे आयुष्यच विस्मयकारी घटनांनी भरलेले आहे. सात नोव्हेंबर या त्यांच्या जन्मदिन चला तर, त्यांच्या कार्याचा धावता आढावा घेऊ या...

परकीय भूमीवरून भारताच्या स्वातंत्र्यासाठी मोलाची कामगिरी केलेल्या एका क्रांतिकारकाची ही कहाणी आहे. डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे हे त्यांचे नाव. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी त्यांनी आपल्या आयुष्याचा अक्षरश: होम केला. स्वातंत्र्यप्राप्तीच्या ध्येयाने त्यांनी जगभर वणवण केली. इंडो-चायना, जपान, अमेरिका, कॅनडा, ग्रीस, तुर्कस्तान, इराण, बलुचिस्तानची सीमा, फ्रान्स, जर्मनी, रशिया, मेक्सिको अशी ही भ्रमंती १८ जानेवारी १९६७ ला शांत झाली.
७ नोव्हेंबर १८८६ रोजी वर्धा येथे जन्मलेल्या या भारतमातेच्या सुपुत्राचा आयुष्यपट चक्रावून टाकणारा आहे. वयाच्या २० व्या वर्षी मातृभूमीला पारखे झालेल्या या वीराची स्वातंत्र्यप्राप्तीची दुर्दम्य आकांक्षा, परकीय ब्रिटिश सत्तेला शस्त्रास्त्रांच्या साहाय्यानेच देशाबाहेर घालवता येईल, ही पक्की मनोधारणा त्यांच्या जीवनप्रवासात जागोजागी दृष्टोत्पत्तीस येते. गदर चळवळींच्या प्रणेत्या खानखोजेंकडे प्रयोगशीलता होती. गदर चळवळीत, मेक्सिकोत शेती संशोधनांतही ती कामी आली; पण या प्रयोगशीलतेचा योग्य उपयोग आमचे शासनकर्ते करून घेऊ शकले नाहीत.
लोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरून १९०६ साली खानखोजेंनी मायदेश सोडला. अमेरिकेत कृषी शिक्षण घेत असताना त्यांनी क्रांतिकेंद्रे काढली. गदर उठावणीच्या आखणीत ते आघाडीवर होते. लाला हरदयाळ, पंडित काशिराम, विष्णू गणेश पिंगळे, वीरेंद्रनाथ चटोपाध्याय, भूपेंद्रनाथ दत्त आदी क्रांतिकारक त्यांच्याबरोबर होते. ब्रिटिश सरकारविरुद्ध सशस्त्र लढा संघटित करण्यासाठी त्यांनी अर्धे जग पालथे घातले, पृथ्वीप्रदक्षिणा केली, अपार साहसे अंगावर घेतली. डॉ. सन्यत सेन, जॉर्ज वॉशिंग्टन काव्‍‌र्हर हे त्यांचे आदर्श होते. दोघेही शेती क्रांतीचे पुरस्कर्ते होते. त्यामुळेच मेक्सिकोत त्यांनी कृषिक्रांती घडवून आणली. हे सगळे करीत असताना मायभूमीच्या ओढीने ते तीन वेळा भारतात आले. पैकी एकदा इराणी नाव, इराणी पासपोर्ट आणि इराणी वेश धारण करून १० जून १९१९ ला मुंबईत आले. लोकमान्य टिळकांना गुप्तपणे भेटले. त्यांनी भारतात न राहण्याचा सल्ला दिला. त्यामुळे परत पॅरिस, बर्लिन, मॉस्को असा प्रवास करून मेक्सिकोत स्थायिक झाले. मॉस्कोत लेनिनशी दोनदा भेट झाली. त्याअगोदर सन्यत सेनशी भेट झाली होती. १९२४ ते १९४९ असे २५ वर्षे भारताबाहेर मेक्सिकोत राहून ते कृषी सल्लागार म्हणून भारतात आले; पण पाच महिन्यांनंतर परत गेले. त्यानंतर फेब्रुवारी १९५० ते ऑगस्ट १९५१ असे दीड वर्षे ते भारतात राहिले; पण इथल्या शासनकर्त्यांनी त्यांना स्वीकारले नाही. अखेर नोव्हेंबर १९५५ मध्ये नागपूरला कायमच्या वास्तव्यासाठी आले ते केवळ मायभूमीत अखेरचा श्वास घ्यायचा म्हणून.
खानखोजे हे कधी काळी तेलंगणातून आलेले कुटुंब असावे. त्यांच्या एका पूर्वजाने पुंडावा करणाऱ्या एका खानाला शोधून काढले होते. म्हणून त्यांचे नाव खानखोजे असे पडले. त्यांचे मातुल घराण्याचे आडनाव फत्तेखानी. एका पुंडावा करणाऱ्या खानाला त्यांनी पकडले म्हणून ते फत्तेखानी झाले. त्यांचे आजोबा व्यंकटेश हे १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात सहभागी झाले होते. त्यांची भेट तंटय़ा भिल्लाशी झाली होती. त्याने त्यांना ब्रिटिशांशी लढा देण्यास सांगितले होते.

डॉ. खानखोजे माध्यमिक शिक्षणासाठी नागपूर येथे आले. नील सिटी हायस्कूलचे ते विद्यार्थी. वयाच्या अठराव्या वर्षी या मुलाचे लग्न केले तर तो मार्गावर येईल या धारणेने त्याच्या आईवडिलांनी त्याचे लग्न ठरवले, पण त्याने लग्नाच्या मांडवातून पलायन केले. बंगाली क्रांतिकारकांशी त्यांचा या सुमारास संपर्क आला. सखाराम देऊस्कर, ब्रह्मबांधव बंडोपाध्याय यांच्याशी भेट झाली. एक वेगळा प्रयोग म्हणून सर्कस चालू केली, पण हा प्रयोग फसला. सर्कस वादळात सापडली आणि अक्षरश: कोलमडली. हा त्यांच्या आयुष्यातील टर्निग पॉइंट ठरला. ते पुण्यास टिळकांना भेटले. (१९०५) टिळकांनी त्यांना जपानला जाण्याचे सुचवले. १६ ऑक्टोबर १९०५ला लॉर्ड कर्झन यांनी वंगभंगाचा आदेश काढला आणि संपूर्ण बंगाल पेटून उठला. ब्रिटिशांची दडपशाही वाढत होती. अशा वातावरणात हा सल्ला टिळकांनी त्यांना दिला होता.
खानखोजेंना भाऊ म्हटले जात असे. भाऊ प्रथम बनारसला जाऊन स्वामी रामतीर्थाना भेटले. रामतीर्थानी त्यांना एक पत्र दिले. भाऊंना मोबासा येथे टाइमकीपरची नोकरी मिळाली, पण जायला मिळाले नाही. अमेरिकन वकिलातीने मदत केली, पण अमेरिकन जहाजाच्या ब्रिटिश कप्तानाने त्यांना प्रवेश नाकारला. नंतर मेसेंजर मेरिटाइम या जहाज कंपनीचे येरा हे जहाज कोलंबोपर्यंत जाणार होते, त्यावर ते हरकाम्या म्हणून नोकरीस लागले. पोलिसांनी कोलंबो येथे चौकशी केली, पण त्यातून ते सुटले. सायगाव येथे उतरल्यावर रिक्षावाल्याने त्यांना हिंदू देवळांत नेले. तेथील पुजारी तेलगू भाषिक. त्याच्याकडून बरीच माहिती मिळवली. पुढील प्रवासात हाँगकाँग, शांघाय येथे उतरू न दिल्याने योकोहामा येथे उतरले. कॅप्टनने त्यांच्यासाठी रदबदली केली. ते जपानी भाषेचे विद्यार्थी झाले. इथे त्यांना गोविंदराव पोतदारांची खूप मदत झाली. इंग्लिशचे वर्ग चालवले. जेवणखाण्याचे हाल होते. इथे त्यांनी इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली. जहाजावर मित्र झालेल्या चिनी मित्रांच्या ओळखीने त्यांची सन्यत् सेनशी भेट झाली. भारतीय स्वातंत्र्य, भारतीय शेती यावर त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
खानखोजे यांनी या काळात स्फोटके हाताळण्याचे प्रशिक्षण घेतले. २ नोव्हेंबर १९०७ रोजी त्यांनी कोबे चेंबर ऑफ कॉमर्सपुढे भाषण दिले. याच काळात त्यांनी हिंदी विद्यार्थ्यांची क्रांती सेना स्थापन केली. १९०६ला सॅनफ्रान्सिस्को येथे भीषण भूकंप झाला होता. पुनर्वसनाच्या कामासाठी मजुरांची आवश्यकता होती. खानखोजे मजूर म्हणून खालच्या डेकचे स्वस्त तिकीट घेऊन सॅनफ्रान्सिस्को येथे गेले. सॅनफ्रान्सिस्को बंदरात त्यांना अडवण्यात आले. तू काय करणार आहेस? खानखोजे उत्तरले. ‘विद्यार्जन’. त्यांना अमेरिकेत प्रवेश मिळाला. बर्कलेला त्यांचे मित्र (सर्व बंगाली) भेटले. एका हॉटेलात भांडी विसळण्याचे काम मिळाले, पण ते नीट होईना म्हणून मालकाने त्यांना काढून टाकले. नंतर एका रुग्णालयात बशा धुण्याचे काम मिळाले. पगार नव्हता, पण राहायला जागा आणि तीन वेळ खाना होता. त्यांनी ‘इंडिया इंडिपेंडन्स लीग’ची स्थापना केली. बर्कले विद्यापीठात त्यांनी शेतीचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. आठवडाअखेर रेल्वेरुळांवर खडी वाहून नेण्याचे हे काम केले. हॉम नावाची सुगंधी फुले वेचली. ही हिरव्या रंगाची फुले बीअरमध्ये वापरत असत.

तिथून ते सॅक्रोमेंटोला पोहोचले. त्यांनी शेतात काम केले. त्यांचा अनेक पंजाब्यांशी परिचय झाला. मेक्सिकन क्रातिकारकांशी घनिष्ठ परिचय झाला. तो पुढे उपयोगी पडला. पोर्टलंड येथे अशिक्षितपणाचे सोंग आणून लाकूड फॅक्टरीत काम मिळवले. १९१०मध्ये त्यांनी शेतीशास्त्राची कॉर्नवालिसची पदवी मिळाली (इ.र.अॠ१्र). राफेल येथील मिलिटरी अ‍ॅकॅडमीत वेटरचे काम मिळाले. तेथे सैनिक प्रशिक्षणही घेतले. इंडिया इंडिपेंडन्स लीग स्थापन केली. पीरखान या नावाने सीएटल, सॅक्रोमेंटो, सॅनफ्रान्सिस्को येथे शाखा काढल्या. वॉशिंग्टन स्टार विद्यापीठात जेनेटिक्सचा अभ्यास केला. स्पोकेन येथे स्ट्रॉबेरीच्या मळ्यांत काम केले. पिंगळे, हरदयाळ यांच्या संपर्कात आले. आझाद हिंद पक्षाचे गदर पार्टी असे नामकरण झाले. त्यांना स्वत:ला गदर हे नाव पसंत नव्हते. (१९१३) युगांतर आश्रमाची स्थापना झाली. जर्मनीने उघड पाठिंबा दिला.
याच काळात सम फॅक्टर्स विच इनफ्लुएन्स द वॉटर रिक्वायरमेंट ऑफ प्लान्टस् हा प्रबंध त्यांनी विद्यापीठाला सादर केला. (दुर्जल कृषीशास्त्र) एम.एस. पदवी मिळवली. पुलमन येथे सॉइल फिजिक्स प्रयोगशाळेत काम केले. अमेरिकन ब्रीडर्स असोसिएशनची लाइफ मेंबरशिप मिळवली. भारतावर सिनेस्लाइड्सच्या साहाय्याने व्याख्याने देणे चालू केले. हिंदू असोसिएशन ऑफ पॅसिफिक कोस्ट या संस्थेची स्थापना केली. गनिमी युद्धाची तयारी सुरू झाली. जुलै १३मध्ये कॉव्‍‌र्हरची भेट झाली. मिनेसोटा विद्यापीठांत पीएच.डी.साठी त्यांनी नाव नोंदवले. पण पहिले महायुद्ध चालू झाले. खानखोजे आणि त्यांचे सहकारी सशस्त्र क्रांतीचा पाठपुरावा करू लागले. पीएच.डी. मागे पडली. याच वेळेला कोमागाटा मारू प्रकरण झाले.

कोमागोटा मारूचा गदर चळवळीशी प्रत्यक्ष संबंध नव्हता, पण खानखोजे आणि त्यांचे सहकारी यांनी सर्वतोपरी साहाय्य केले. चळवळीच्या प्रहारक विभागाचे खानखोजे प्रमुख होते. दहा हजार स्वयंसेवक लढण्यासाठी तयार होते. त्यांच्या वेगवेगळय़ा तुकडय़ा करून भारतात शिरण्याची योजना होती. जर्मनीचा उघड पाठिंबा होता. भारतीय जनतेस जागे करण्यासाठी एम्डेनने पूर्व किनाऱ्यावर हल्ला केला, पण अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. खानखोजे पीएच.डी. अर्धवट टाकून निघाले. न्यूयॉर्कला भारतीय पासपोर्ट मिळाला नाही तेव्हा तुर्कस्तान, इराण, बलुचिस्तानमार्गे शिरण्याची योजना झाली. सप्टेंबर १९१४ मध्ये तिघे जण निघाले. आगाशे (मिर्झा महमद अली), खानखोजे (महमदखान), कोचर (दाऊदखान) यापैकी आगाशे यांच्याकडे इराणीयन पासपोर्ट होता. इराणी जेन्डार्मीत ते मोठय़ा हुद्दय़ावर होते. न्यूयॉर्क, अथेन्स, पिरओस- वेगवेगळ्या जहाजांनी, स्मर्नास रेल्वेने आले. कोचर यास प्रचार साहित्यासह जहाजाने मुंबईत पाठवले. पण त्यास पंजाबात पकडण्यात आले. खानखोजे यांचा पुढचा प्रवास इस्तंबुल (सप्टेंबर १९१४), बगदाद (डिसेंबर १९१४), पुस्तइकुत (फेब्रवारी १९१५), बुशायर (मार्च १९१५) असा झाला. इस्कोनडेरेन येथे रेल्वेवर ब्रिटिश विमानांनी हल्ला केला. ते थोडक्यात बचावले. पर्शियात त्यांनी lp18महमदखान हे नाव घेतले होते. पर्शियन सीमेपर्यंत जाण्यासाठी रात्रीच्या वेळी होडीतून २०० मैल जावे लागले. पर्शिया जर्मनीच्या बाजूने होता. देशफुल येथे ब्रिटिश हल्ल्यामुळे रातोरात पळावे लागले. बुशायर येथे जनानखान्यात लपावे लागले. नंतर जनान्याबरोबरच ते शहराच्या बाहेर पडले. शिराजला एप्रिल १९१५, निरीज ऑगस्ट १९१५, केरमान नोव्हेंबर १९१५, ३५० मैल वाळवंटी प्रवास करून बलुचिस्तान सीमेपर्यंत आले. गदरचे हंगामी सरकार १ डिसेंबर १९१५ ला स्थापन केले. जर्मनी, तुर्की, हंगेरी या सरकारांनी मान्यता दिली, पण फासे उलटे पडू लागले होते. स्थानिक सुलतान दगाबाज निघाला. खानखोजे यांना उंटावरून पळ काढावा लागला. काही गदर सैनिक मेले. बाफ्त येथे बर्फाच्छादित पर्वतराजींतून प्रवास  झाला. इथे ते इंग्रजांचे कैदी झाले. पण ते बहाई सुन्नी शिपायांत स्वातंत्र्याचा प्रचार करीत राहिले. त्यांनी खानखोजेंची साखळदंडांतून मुक्तता केली. रात्री त्यांनी छावणीतून पलायन केले. एका गुहेत राहिले. पोट बिघडले होते. उपाशी, खोकला, ताप होता असताना बर्फाळ उतारावरून स्वत:ला खाली झोकून दिले. दोन टोळीवाल्यांनी त्यांना पकडले. त्यांच्या प्रमुखाने त्यांना आश्रय दिला, पण तो त्यांनी स्वीकारला नाही. त्यांनी दरवेशाचा वेश घातला आणि पळाले. नाही तर युद्धकैदी झाले असते. बलुची टोळीत वर्षभर राहिले. याच काळात त्यांना व्हर्टिगोचा त्रास सुरू झाला. पर्शियन युद्ध थांबले होते. ब्रिटिशांनी पर्शियन सरदाराने खानखोजे यांना स्वाधीन करावे असे सांगितले होते. खानखोजे काशघईच्या वेषांत पळाले म्हणून वाचले. उरुजान येथे प्रयाण केले. काशगई प्रमुख सहामे याचे ते स्वीय सहायक बनले. १ डिसेंबर १९१५ ते ११ नोव्हेंबर १९१८ या काळात स्वतंत्र हिंदुस्थानाचे सरकार अस्तित्वात होते. इराणी बलुचिस्तानच्या भागात ते होते. उरुजान येथे ते इंग्लिश आणि शेतीशास्त्र शिकवू लागले. याच सुमारास सुलतान आजारी झाला आणि उपचारासाठी त्याला मुंबईमार्गे युरोपला जायचे होते. खानखोजे त्याच्याबरोबरच मुंबईत आले. गिरगावात पोतदार यांच्यामार्फत टिळकांना भेटले.

टिळकांनी खानखोजे यांना पर्शियात परत जायला सांगितले. गदर चळवळ संपली होती. त्याची अनेक कारणे होती. १) भारतीय जनतेचा अनुत्साह. २) एम्डेन प्रकरणांनंतर जर्मनीचा भारतीय स्वातंत्र्य लढय़ांतील उत्साह कमी झाला होता. ब्रिटिश सरकारने ४३ फरारी क्रांतिकारकांची नावे घोषित केली. त्यांच्यावर मृत्यूचा हुकूमनामा होता. खानखोजे यांचे नाव त्यात होते. काळ्या यादीतले नाव स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही काढले गेले नव्हते. ३) महायुद्धात हरल्याने जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी याचा पाठिंबा गेला. ४) खुद्द पंजाबमध्ये या चळवळीला फारसा पाठिंबा मिळाला नाही. ५) कोमागाटा मारूच्या प्रकरणातील एकही जण पंजाबपर्यंत पोहोचू शकला नाही. त्यामुळे जनजागृती झाली नाही. ६) गदर चळवळीला खालसा दिवाणचा पाठिंबा नव्हता. ७) किरपालसिंग फितूर झाला. ४२ जण फांशी गेले, ११४ ना काळेपाणी, ९३ सश्रम कारावास, कर्तारसिंग, पिंगळे हे फाशी गेले.

नोव्हेंबर १९२१ मध्ये सुलतानचे प्रमाणपत्र घेऊन खानखोजे जर्मनीत गेले. रशियास भेट दिली. गदर चळवळीत तीन गट झाले होते. एम्. एन्. रॉय उघडपणे लेनिनवादी होते. कम्युनिझम प्रथम, स्वातंत्र्य नंतर, अशी त्यांची भूमिका होती. खानखोजे आधी स्वातंत्र्य, मग साम्यवाद अशी भूमिका मांडत होते. लेनिनशी त्यांची दोनदा भेट झाली होती. रॉय गट गदर क्रांतिकारकांविरुद्ध जात होता, अशी शंका होती. त्यामुळे रशिया वा जर्मनीत वावरणे धोक्याचे झाले होते. काही गदर कार्यकर्त्यांचा रहस्यमय शेवट झाला होता. बर्लिनमध्येही राहणे धोक्याचे होते. अमेरिका ब्रिटनच्या बाजूने उतरली होती. अमेरिकेतील सर्व गदर मालमत्ता जप्त करण्यात आली होती.


खानखोजे यांनी सर्व विचारांती मेक्सिकोत जाण्याचा निर्णय घेतला. ज्या मेक्सिकन क्रांतिकारकांबरोबर मोलमजुरी केली होती, त्यापैकी काही आता स्वतंत्र मेक्सिकोत मोठय़ा पदावर होते. रोमन नेग्री हे शेतीमंत्री झाले होते. जानेवारी १९२४ मध्ये खानखोजा मेक्सिकोत दाखल झाले. स्कूल ऑफ अ‍ॅग्रिकल्चरमध्ये प्रोफेसर म्हणून शिकवू लागले. त्यांना आठ भाषा येत होत्या. पण स्पॅनिश येत नव्हती. प्रस्तुत लेखकाला १९५६-५७ मध्ये नागपूरला नोकरीनिमित्ताने मादाम जान खानखोजेंकडून फ्रेंच शिकण्याची संधी मिळाली.

खानखोजे यांनी जेनेटिक्समध्ये संशोधन केले. गव्हाची अनेक नवीन वाणे तयार केली. मक्याच्या जनुकांत मूलभूत फेरफार करून मक्याच्या एका कणसाचे उत्पन्न पाचपट केले. खानखोजे शेतकऱ्यांचे देव बनले. ख्रिस्ताच्या बरोबरीने त्यांची छायाचित्रे घराघरांतून लागली. मक्याच्या एकेका ताटावर तीस-तीस कणसे. मक्याची निर्यात वाढली. शेतकऱ्याकडे पैसा आला. खानखोजे यांना चापिंगोचा जादूगार असे नांव मिळाले. चापिंगो त्यांचे राहण्याचे गाव. तूर, चवळी, जंगली वाल, सोया डाळ, शेवगा यावर त्यांनी संशोधन केले. अगदी निवडुंगावरसुद्धा. मेक्सिकन रेल्वेने त्यांना दहा हजार एकर पडीक जमीन लागवडीसाठी दिली. त्यांनी ‘जेनेटिक्स’ हा विषय शिकवला. १९३१-३२ मध्ये मेक्सिकन सरकारचे प्रतिनिधी म्हणून ते पॅरिस, बेल्जियम, जर्मनी येथे गेले. परत आल्यावर त्यांनी व्हेराक्रूझ येथे डाळिंबाची नवी जात विकसित केली. १९३६ मध्ये वयाच्या ५२ व्या वर्षी २७ वर्षांनी तरुण असलेल्या जान सिंड्रिक तरुणीशी विवाहबद्ध झाले. जानची जानकी झाली. मेक्सिकोतील बेल्जियम कॉन्सलरची ती मेव्हणी होती. तिने त्यांना मागणी घातली. खानखोजे रेल्वेचे शेतीखातेप्रमुख झाले. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी रबरावर संशोधन करून त्याचे उत्पन्न वाढवले. जंगली कंदापासून ्िर२स्र््रं ँं१ेल्ली बनवले. १९२७ मध्ये खानखोजे यांच्यावरील बंदी उठवावी, असा प्रयत्न माधव अणे यांनी केला, पण त्यांना यश आले नाही. दरम्यान, मेक्सिकोतील खाणधंद्यात गुंतलेली त्यांची सगळी रक्कम बुडाली. १९१९ च्या गुप्त भेटीनंतर एप्रिल १९४९ मध्ये मध्य प्रदेश सरकारचे पाहुणे म्हणून आले. पण विमानतळावर त्यांना १२ तास थांबावे लागले. कारण त्यांचे नाव काळ्या यादीत होते. सप्टेंबर १९४९ मध्ये ते परत गेले. मार्च १९५० ला परत आले. जून १९५१ ला परत गेले. ३० नोव्हेंबर १९५५ ला वयाच्या ७० व्या वर्षी ते भारतात कायमसाठी आले.

ते नागपूर वसतिगृहात सुपिरटेंडेंट होते. लक्ष्मी नारायण इन्टिटय़ूटमध्ये ते जर्मन शिकवीत, नागपूर रेडिओवर व्याख्याने देत. भारत सरकारने १९६३ पासून त्यांना २५० रुपये पेन्शन म्हणून चालू केले. त्यांचा मृत्यू १८ जानेवारी १९६७ ला झाला. १९६१ मध्ये त्यांना भारतीय नागरिकत्व मिळाले. त्यांच्या पत्नीने फ्रेंच ट्रान्सलेटर म्हणून काम केले. फ्रेंच भाषेचे वर्ग चालवले. त्यांना १९८१ मध्ये नागरिकत्व मिळाले. त्यांचा मृत्यू जुलै १९९१ ला दिल्ली येथे झाला. त्यांची मोठी मुलगी सावित्री भारतात स्थायिक झाली. धाकटी कॅनडात स्थायिक झाली.

(संदर्भ -खानखोजे यांच्या कार्याचा उल्लेख अनेक पुस्तकांतून आलेला आहे. ‘रणझुंजार डॉ. पां. स. खानखोजे यांचे चरित्र’ (ग. वि. केतकर), ‘कथा एका क्रांतिकारकाची’ (म. ना. काळे) ही पुस्तके अनेक वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाली. क्रांतिकार्यविषयक अनेक पुस्तकांतून त्यांच्या कार्याचा उल्लेख झाला आहे. अलीकडील तीन पुस्तके आहेत.
१.     नाही चिरा- वीणा गवाणकर १९९७ राजहंस

२.     आय श्ॉल नॉट आस्क फॉर पार्डन – सावित्री साहनी २०११ (पेंग्विन)

३.     क्रांती आणि हरित क्रांती- उपरोक्तचा मराठी अनुवाद.

७-११-२०११ सुहास फडके- अमेय प्रकाशन)

     

Sunday, 6 February 2022

भारतरत्न लता_मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

 आपल्या मंजुळ स्वरांची मोहिनी टाकत अख्ख्या जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका आणि भारतरत्न पुरस्काराने सन्मानित #लता_मंगेशकर यांचे आज (६ फेब्रुवारी २०२२) वृद्धापकाळानं निधन झालं.

लता मंगेशकर यांचा अल्पपरिचय.

जन्म. २८ सप्टेंबर १९२९ इंदोर येथे.



लता मंगेशकर यांची गाणी म्हणजे रसिकांसाठी मोठी पर्वणीच होती. लता मंगेशकर, भारतीय चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायनाच्या इतिहासातील एक सुवर्णपान. यांचा जन्म मध्य प्रदेशातील इंदूर येथील मराठी भाषिक गोमंतक कुटुंबात झाला. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक आणि नाट्य अभिनेते होते, त्यामुळे लताजींना संगीताचा वारसा लहानपणापासूनच मिळाला. त्यांना लहानपणी “हेमा” या नावाने हाक मारली जायची, पण दिनानाथ यांच्या नाटकातील 'लतिका' या पात्राच्या नावावरुन त्यांनी लता नाव ठेवल्याचे म्हटले जाते.

लता मंगेशकर यांनी वयाच्या १३ व्या वर्षी गायनात पाऊल ठेवले होते आणि १९४२ मध्ये त्यांनी पहिले गाणे रेकॉर्ड केले होते. लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला होता. मीना खडीकर, आशा भोसले, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर या भावंडांमध्ये त्या सर्वात मोठ्या होत्या. 

आपल्या वडिलांच्या मराठी संगीत नाटकात त्यांनी पाचव्या वर्षी काम सुरू केले.

वयाच्या १३ व्या त्यांनी किती हासाल या चित्रपटात नाचू या गडे खेळु सारी मनी हौस भारी हे गाणे म्हटले. मात्र त्याचा समावेश झाला नाही.१९४२ मध्ये पाहिती मंगळागौर या सिनेमात त्यांनी छोटीशी भूमिकाही केली आणि नटली चैत्राची नवलाई हे गाणेही गायले. गजाभाऊ या मराठी चित्रपतात माता एक सुपुत की दुनिया बदल दे तू हे पहिले हिंदी गीत गायले.

लता दीदी १९४३ मध्ये मुंबईत स्थायिक झाल्या. त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवण्यास भिंड बझार घराण्याचे उस्ताद अमन अली खान यांच्याकडे सुरवात केली. वसंत जोगळेकर यांच्या आपकी सेवा मे (१९४६) पा लागून कर जोरी हे गीत त्यांनी गायले. त्याला दत्ता डावजेकर यांनी संगीत दिले होते.१९४५ बडी माँ या चित्रपटात त्यांनी माता तेरे चारणोमे हरभजन म्हटले.

लता मंगेशकर यांना हिंदी चित्रपटसृष्टीत पहिला ब्रेक मिळाला तो आयेगा आने वाला या गाण्यासाठी हे गाण इतकं प्रसिद्ध झालं की त्यांच्याकडे गाण्यासाठी रांग लागली.आपल्या सात दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध भाषांमध्ये ३० हजारांहून अधिक गाणी गायली. लता मंगेशकर यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली होती व  २० हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं होते. 'एक प्यार का नगमा है', 'राम तेरी गंगा मैली', 'एक राधा एक मीरा' आणि 'दीदी तेरा देवर दीवाना' यांसारख्या लोकप्रिय गाण्यांमागे लता मंगेशकर यांनी आवाज दिला.

लता मंगेशकर यांना १९६९ मध्ये तिसरा-सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण, १९९९ मध्ये द्वितीय-सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले. २००१ मध्ये त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत रत्न या सर्वोच नागरी पुरस्काराने सन्मानित केले एम एस सुब्बलक्ष्मी यांच्यांनंतर हा पुरस्कार पटकावणाऱ्या दुसऱ्या गायिका होत्या.त्यांना २००९ मध्ये ऑफिसर ऑफ द लीजन ऑफ ऑनर हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला. तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, बंगाल चित्रपट पत्रकार पुरस्कार 15 वेला तर फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट गायिका पुरस्कार चार वेळा पटकावला. त्यांना फिल्मफेअर कडून दोनदा विशेष सन्मान करण्यात आला होता. १९९२ मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारनं लता मंगेशकर यांच्या नावाने लता मंगेशकर पुरस्कार नावानेही पुरस्काराचीही सुरुवात केली. तर मध्य प्रदेश सरकरानंही १९८४ सालापासून लता मंगेशकर पुरस्कार देण्याची परंपरा सुरू केली. जी अविरत सुरू आहे. तसेच त्यांना १९८९ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला होता.आकाशात देव आहे का असं कुणी विचारलं तर देवाचं माहित नाही. पण आकाशात सुर्य आहे, चंद्र आहे आणि लताचा स्वर आहे!. दिवस-रात्र अशी कुठलीही वेळ नाही किंवा क्षण नाही की लताचा स्वर या जगात कुठून तरी कुठेतरी जात येत असतो, अशा शब्दांत पु.ल.देशपांडे यांनी लतादीदींच्या महतीचं वर्णन केलं होतं. 

लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Saturday, 22 January 2022

भारताचे 21 परमवीर चक्र विजेत्यांची शौर्य गाथा।

परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्य सैन्य पुरस्कार असून युद्धकाळात गाजवलेल्या अतुलनीय कामगिरी बाबत हा पुरस्कार देण्यात येतो. आतापर्यंत २१ परमवीर चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आले असून त्यातले १४ पुरस्कार हे मरणोत्तर आहेत. एकवीसपैकी वीस पुरस्कार भारतीय सैन्य तर एक वायुसेनेच्या सदस्यांस प्रदान केले गेले आहेत.
१) मेजर सोमनाथ शर्मा - १९४७
 31 जानेवारी 1923 रोजी जम्मू येथे जन्मलेले मेजर सोमनाथ शर्मा 22 फेब्रुवारी 1942 रोजी चौथ्या कुमाऊ रेजिमेंटमध्ये कमिशन्ड ऑफिसर म्हणून भारतीय सैन्यात दाखल झाले.  मरणोत्तर परमवीर चक्राने सन्मानित, मेजर सोमनाथ शर्मा यांची लष्करी कारकीर्द दुसऱ्या महायुद्धात सुरू झाली, जेव्हा त्यांना मलायाच्या रणात पाठवण्यात आले.  3 नोव्हेंबर 1947 रोजी मेजर सोमनाथ शर्मा यांच्या तुकडीला काश्मीर खोऱ्यातील बडगाम आघाडीवर जाण्याचे आदेश देण्यात आले.  जेव्हा 500 शत्रू सैनिकांनी भारतीय सैन्याला तिन्ही बाजूंनी घेरले आणि हल्ले करण्यास सुरुवात केली तेव्हा मेजर शर्मा यांनी शत्रूचा धैर्याने सामना केला.
 मेजरच्या सैन्यातील बरेच सैनिक मरण पावले होते आणि थोडेच सैनिक उरले होते.  मेजर सोमनाथ यांच्या डाव्या हातालाही दुखापत झाली, पण त्यांनी हार मानली नाही.  ते म्यग्जिन भरून सैनिकांना देत गेले, परंतु दुर्दैवाने ते शत्रूच्या तोफाचे लक्ष्य बनले आणि शहीद झाले.  शेवटच्या क्षणीही तो आपल्या सैनिकांना तोंड देण्यासाठी प्रोत्साहन देत राहिला.  मेजर सोमनाथ हे परमवीर चक्र प्राप्त करणारे पहिले भारतीय होते.
2. नायक जदुनाथ सिंग- 1948
 21 नोव्हेंबर 1916 रोजी उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यातील खजुरी गावात जन्मलेले नायक जदुनाथ सिंह हे 1941 मध्ये भारतीय लष्कराच्या राजपूत रेजिमेंटमध्ये भरती झाले.  जानेवारी 1948 मध्ये आतंकवादी च्या आक्रमणादरम्यान त्यांनी नौशेरा भागात आपल्या तुकडीचे नेतृत्व केले.
एकामागून एक, जदुनाथचे सैनिक कमी होत गेले, पण त्यांचा उत्साह वाढला.  जेव्हा सर्व सैनिक जखमी झाले तेव्हा जदुनाथने स्टेनगनमधून गोळ्या झाडून शत्रूंचा एकहाती सामना केला.  त्याने शत्रूला माघार घ्यायला लावली.  प्यारा राजपूतच्या इतर 3 तुकड्या समोर येईपर्यंत जदुनाथ लढत राहिला.  पण, अचानक कुठूनतरी गोळी येऊन त्यांच्या डोक्याला लागली आणि ते वीरगती पावले.  त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आले.
3. सेकंड लेफ्टनंट रामा राघोबा राणे - 1948
 धारवाड, कर्नाटकातील हवेली गावात २६ जून १९१८ रोजी जन्मलेल्या रामा राघोबा राणे यांना हयात असतानाच लष्कराचा सर्वोच्च नागरी सन्मान परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले.  जुलै 1940 मध्ये बॉम्बे इंजिनीअरमध्ये रुजू झाल्यानंतर त्यांना नाईक म्हणून बढती मिळाली आणि 26 इन्फंट्री डिव्हिजनच्या 28 फील्ड कंपनीत रुजू झाले.  रामाने आपल्या बुद्धिमत्तेने, शौर्याने, नेतृत्व क्षमतेने सर्वांना प्रभावित केले आणि त्यांना सेकंड लेफ्टनंट बनवून जम्मू आणि काश्मीरमध्ये पोस्ट करण्यात आले.
 काश्मीरमधील आदिवासींच्या आक्रमणाच्या वेळी नौशेरा जिंकल्यानंतर भारतीय सैन्याने तयार केलेल्या शत्रूविरोधी धोरणाचा एक भाग म्हणून बारवली रिज, चिंगास आणि राजौरी ताब्यात घेण्यासाठी नौशेरा-राजौरी मार्गावरील भौगोलिक अडथळे आणि शत्रूचे बोगदे साफ करणे आवश्यक होते. .  8 एप्रिल 1948 रोजी रामा राघोबा आणि त्यांच्या सैन्याने वळणदार रस्ते, बोगदे आणि अनेक अडथळे पार करून या आघाडीवर धैर्याने आणि हुशारीने काम केले आणि 10 एप्रिल पर्यंत लढत राहिले.  11 एप्रिल 1948 पर्यंत त्यांनी चिंगांचा मार्ग मोकळा केला आणि या दिवशीही रात्री 11 वाजेपर्यंत पुढच्या वाटेतील सर्व अडथळे दूर केले.  भारताच्या विजयासाठी सेकंड लेफ्टनंट रामा राघोबाचे हे योगदान अत्यंत महत्त्वाचे होते.  सुदैवाने हा सन्मान त्यांनाच मिळाला.

4. कंपनी हवालदार मेजर पिरू सिंग शेखावत 1948
 लष्करी पार्श्वभूमी असलेले कंपनी हवालदार मेजर पिरुसिंह शेखावत यांचा जन्म 20 मे 1918 रोजी राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील रामपुरा बेरी गावात झाला.  1936 मध्ये ते ब्रिटिश भारतीय सैन्यात दाखल झाले.  त्याचे वडील आणि आजोबाही सैन्यात होते.  तो राजपुताना रायफल्सच्या डी कंपनीत दाखल झाला.  मेजर पिरुसिंग शेखावत यांना मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आले.
 १९४८ च्या उन्हाळ्यात पाकिस्तानी सैन्य आणि आतंकवादी मिळून जम्मू-काश्मीरवर आक्रमण करून त्यांना किशनगंगा नदीवर मोर्चा सोडण्यास भाग पाडले तेव्हा भारतीय लष्कराने तिथवळ टेकडीवर मोर्चा नेला.  शत्रू उंचीवर त्याच्या जागी बसला होता.  तेथून शत्रूला हुसकावून लावण्याची जबाबदारी राजपुताना रायफल्सच्या डी कंपनीवर सोपवण्यात आली.  या कंपनीचे प्रमुख पिरुसिंह शेखावत होते.  भारतीय सैनिकांना एका अरुंद आणि धोकादायक मार्गावरून जावे लागले, जे फक्त 1 मीटर रुंद होते आणि दुसऱ्या बाजूला एक पास होता.  हा मार्ग शत्रूच्या बंकरच्या जेडीमध्ये होता, ज्याचा फायदा घेत शत्रूने डी कंपनीवर जोरदार हल्ला केला आणि 51 सैनिक शहीद झाले.
 
 बहादुर पिरुसिंग आपल्या उर्वरित साथीदारांसह राजा रामचंद्र की जयच्या घोषणा देत पुढे निघून गेला.  त्याचे संपूर्ण शरीर गोळ्यांनी घायाळ झाले होते, परंतु तो शत्रूवर गोळीबार करत राहिला.  ते सतत पुढे जात होते, शत्रूंना खोडून काढत होते, जेव्हा बॉम्बस्फोटाने त्यांचा चेहरा जखमी झाला होता आणि त्यांची दृष्टी कमी झाली होती, परंतु तरीही ते शत्रूचे दोन बंकर नष्ट करण्यात यशस्वी झाले.  डोक्यात गोळी लागल्याने त्याने तिसऱ्या बंकरवर बॉम्ब टाकला होता.  पिरुसिंगने शत्रूचा नाश केला, पण तो स्वतः माता भारतीच्या मांडीवर कायमचा झोपला.  शेखावत यांना मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आले.

5. लान्स नाईक करम सिंग - 1948
 15 सप्टेंबर 1915 रोजी पंजाबच्या संगरूर जिल्ह्यातील भलियन येथे जन्मलेल्या लान्सनायक करम सिंह यांना 1948 मध्ये परमवीर चक्र (जिवंत असताना) प्रदान करण्यात आले.
 
 दुसऱ्या महायुद्धादरम्यान, करम सिंग वयाच्या 26 व्या वर्षी सैन्यात दाखल झाले, जिथे त्यांची शिख रेजिमेंटमध्ये नियुक्ती झाली.  दुसऱ्या महायुद्धातील त्यांच्या शौर्याबद्दल, करम सिंग यांना 1944 मध्ये सेना पदक देण्यात आले आणि त्यांना लान्स नायक म्हणून बढती देण्यात आली.
 
 1947 मध्ये भारत-पाकिस्तानच्या युद्धात मेजर सोमनाथ शर्मा यांच्या हौतात्म्यानंतर लान्सनायक करम सिंग यांनी आघाडी चांगलीच सांभाळली आणि विजय तर मिळवलाच, पण आपले सैन्यही अबाधित ठेवले.  लान्स नाईक करम सिंह यांना स्वतःच्या हस्ते परमवीर चक्र पुरस्कार मिळाला आणि दीर्घायुष्य जगताना त्यांनी १९९५ मध्ये त्यांच्याच गावात अखेरचा श्वास घेतला.

6. कॅप्टन गुरबचन सिंग सलारिया- 1961 (चीन युद्ध)
 कॅप्टन गुरबचन सिंग सलारिया यांचा जन्म 29 नोव्हेंबर 1935 रोजी पंजाब प्रांतातील शकरगड (आता पाकिस्तान) येथील जानवाल गावात झाला.  1946 मध्ये जॉर्ज रॉयल मिलिटरी कॉलेज, बंगळुरूमध्ये प्रवेश घेतल्यानंतर 1947 मध्ये त्याच कॉलेजच्या जालंधर शाखेत त्यांची बदली झाली.  यानंतर, 1953 मध्ये, ते राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये पोहोचले, तेथून ते कॉर्पोरल पदासह सैन्यात दाखल झाले.
 
 3/1 गुरखा रायफल्सचे कॅप्टन गुरबचन यांना एलिझाबेथ व्हिला यांच्याकडे संयुक्त राष्ट्रांचे लष्करी प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यात आले होते.  संयुक्त राष्ट्रांच्या लष्करी काँगोच्या बाजूने हस्तक्षेप करण्याचा आणि परदेशी व्यावसायिकांना रोखण्यासाठी आवश्यक असल्यास बळाचा वापर करण्याच्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावामुळे निराश झालेल्या परदेशी व्यावसायिकांनी संयुक्त राष्ट्रांच्या सैन्याच्या मार्गात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.
 
 विदेशी व्यापाऱ्यांच्या रणनीतीनुसार, 5 डिसेंबर 1961 रोजी, एलिझाबेथ व्हिलाच्या चौकात तैनात असलेल्या शत्रूचे 100 सैनिक कॅप्टन गुरबचन सिंग सलारिया यांनी केवळ 16 सैनिकांसह लढले आणि 40 सैनिकांचा ढीग करण्यात त्यांना यश आले.  समोरासमोर झालेल्या या चकमकीत कॅप्टनला एकापाठोपाठ दोन गोळ्या लागल्या आणि तो वीरगती पावला.

7. मेजर धनसिंग थापा- 1962 (जिवंत)
 10 एप्रिल 1928 रोजी हिमाचल प्रदेशातील शिमला येथे जन्मलेले धनसिंग थापा 1949 मध्ये कमिशन्ड ऑफिसर म्हणून सैन्यात दाखल झाले.  1962 मध्ये चीनने भारतावर हल्ला करण्याची तयारी केली, तेव्हा भारत त्यासाठी अजिबात तयार नव्हता, तसेच मुत्सद्दींच्या मनाची स्थितीही तशी नव्हती.  या परिस्थितीत, मेजर धनसिंग थापा यांच्या नेतृत्वाखाली 8 गोरखा रायफल्सच्या 1ल्या बटालियनच्या डी कंपनीला सिरी जाप येथे एक चौकी बांधण्याचे आदेश देण्यात आले.
 
 चिनी सैन्याशी शौर्याने लढत असताना, धनसिंगच्या तुकडीमध्ये फक्त ३ लोक उरले असताना, चीनने हल्ला सुरूच ठेवला आणि धनसिंग थापा आणि इतर दोन साथीदारांना कैद करून अनेक प्रकारे छळ करून भारतीय सैन्याचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला.  पण दीर्घकाळ त्रास सहन करूनही धनसिंग थापा आपल्या देशभक्ती आणि शौर्याशी खरा राहिला.  शत्रूपासून मुक्ती मिळवून ते भारतात परतले आणि त्यांना सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावर बढती मिळाली.  त्यांना जिवंतपणी परमवीर चक्रानेही सन्मानित करण्यात आले होते.  लष्करातून मुक्त झाल्यानंतर थापा यांनी लखनऊमध्ये सहारा एअरलाइन्सच्या संचालकपदाची जबाबदारी स्वीकारली.

8. सुभेदार जोगिंदर सिंग
 सुभेदार जोगिंदर सिंग साहनन, एक भारतीय सैनिक ज्यांना परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले होते, त्यांचा जन्म 26 सप्टेंबर 1921 रोजी मोगा, पंजाब येथे झाला.  सुभेदार जोगिंदर 1962 च्या भारत आणि चीनमधील युद्धात सामील होते.  या युद्धात चीनशी लढलेल्या चार शूर सैनिकांपैकी जोगिंदर सिंग हे देखील एक होते, ज्यांना परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले होते.
 
 20 ऑक्टोबर 1962 रोजी, जेव्हा चिनी सैन्य तवांगच्या दिशेने जात होते, तेव्हा त्यांच्या एका विभागाच्या सैन्यासमोर फक्त एक भारतीय शीख कंपनी होती, ज्याचे नेतृत्व सुभेदार जोगिंदर सिंग करत होते.  भारताच्या तुलनेत चिनी सैन्यात सैनिकांची संख्या जास्त होती, पण तरीही सुभेदार सिंग आणि त्यांचे साथीदार या चकमकीत हिंमत न गमावता पूर्ण उत्साहाने लढले आणि पुढे जाणाऱ्या चिनी सैन्याला आव्हान देत राहिले.  अखेर सुभेदार व त्याचे उरलेले सैनिक शत्रूच्या ताब्यात आले.
 
 ती आघाडी भारताला जिंकू शकली नसली तरी सुभेदार जोगिंदर सिंग यांनी त्यावेळी दाखवलेले शौर्य सलाम करण्यासारखे होते.  शत्रूच्या ताब्यात आल्यानंतर त्याच्याबद्दल काहीच कळले नाही.  चिनी सैन्याने त्याचा मृतदेह भारताकडे सोपवला नाही किंवा त्याची कोणतीही बातमी दिली नाही.  पण त्यांचे शौर्य आणि हौतात्म्य भारतीय इतिहासाच्या पानात अजरामर झाले.

9. मेजर शैतान सिंग भाटी- 1962
 मेजर शैतान सिंग भाटी यांचा जन्म 1 डिसेंबर 1924 रोजी जोधपूर (राजस्थान) येथे झाला.  त्यांचे वडील हेमसिंग भाटी हे देखील सैन्यात लेफ्टनंट कर्नल होते.  मेजर शैतान सिंग यांनी १९६२ च्या भारत-चीन युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली होती.  13 कुमाऊं सी कंपनीचे मेजर शैतान सिंग यांनी रेझांग ला आघाडीवर चिनी सैन्याचा शौर्याने मुकाबला केला आणि 18 नोव्हेंबर 1962 रोजी हौतात्म्य पत्करण्याआधीच ते चुशूर सेक्टरमध्ये 17,000 फूट उंचीवर चिनी सैन्याचे जड बख्तरबंद होते.
 
 सिंह यांना शत्रूने वेढलेल्या स्थितीत, तरीही त्यांनी धैर्याने लढा दिला, आपले सैन्य संघटित केले आणि त्यांना तळांवर तैनात केले आणि त्यांना प्रोत्साहन दिले, परंतु जेव्हा शत्रूची एक गोळी त्याच्या हाताला लागली आणि त्याचा पायही जखमी झाला, तेव्हा त्याने आदेश दिला. सैनिकांनी स्वतःला तिथे सोडून शत्रूचा सामना करावा.  शत्रूशी लढताना एकामागून एक मेजरचे जवान शहीद झाले.  त्या बर्फाच्छादित भागात ३ महिन्यांनंतर मेजर सिंग यांचा मृतदेह युद्धभूमीवर सापडला.  शैतान सिंग यांना मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आले.

10. कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार अब्दुल हमीद - 1965
 1 जुलै 1933 रोजी उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथील धरमपूर गावात जन्मलेले वीर अब्दुल हमीद हे कुस्ती, लाठी आणि गोफण नेमबाजीत निपुण होते.  1954 मध्ये वयाच्या 21 व्या वर्षी ते सैन्यात दाखल झाले आणि 27 डिसेंबर 1954 रोजी ग्रेनेडियर्स इन्फंट्री रेजिमेंटमध्ये सामील झाले.  जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेल्या अब्दुल हमीदने पाकिस्तानी दहशतवादी डाकू इनायत अलीला पकडल्यानंतर त्याला लान्स नायक म्हणून बढती देण्यात आली.
 
 10 सप्टेंबर 1965 रोजी भारतावर पाकिस्तानने हल्ला केला तेव्हा अब्दुल हमीदने आपल्या जिवाची पर्वा न करता, अमृतसरला वेढा घालण्याच्या तयारीत असलेल्या पाकिस्तानी सैन्याची खिल्ली उडवत आपल्या तोफखान्याच्या जीपने शत्रूचे 3 टँक नष्ट केले.  हे पाहून थक्क झालेल्या पाक अधिकाऱ्यांनी त्याला घेरले आणि त्याच्यावर हल्ला केला आणि शत्रूच्या गोळीबारात तो शहीद झाला.  भारत-पाकिस्तान युद्धातील त्यांच्या असाधारण योगदानाबद्दल त्यांना महावीर चक्र आणि परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले.  भारतीय टपाल विभागाने त्यांच्यावर एक टपाल तिकीटही जारी केले होते.

11. लेफ्टनंट कर्नल अर्देशीर बुर्जोरजी तारापोर - 1965
 18 ऑगस्ट 1923 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे जन्मलेले अर्देशीर बुर्जोरजी तारापोर हे आदी या नावाने प्रसिद्ध होते.  त्यांचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराज सैन्यात सर्वोच्च पदावर होते, त्यांना 100 गावे इनाम म्हणून देण्यात आली होती, त्यापैकी मुख्य गाव तारापोर होते.  या कारणास्तव त्यांना तारापोर म्हणतात.  पूना येथे मॅट्रिक पूर्ण केल्यानंतरच ते सैन्यात दाखल झाले आणि 1 जानेवारी 1942 रोजी 7व्या हैदराबाद इन्फंट्रीमध्ये कमिशन्ड ऑफिसर म्हणून नियुक्त झाले.  नंतर त्यांची आर्मर्ड रेजिमेंटमध्ये नियुक्ती झाली.
 
 1965 च्या युद्धात जेव्हा तारापोर फिलौरा वर हल्ला करून चाविंडा जिंकण्यासाठी तुकडीने पुढे जात होते, तेव्हा शत्रूने प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला, ज्याला तारापोरने फिल्लौरावर हल्ला करण्यासाठी पायदळाच्या तुकडीसह शौर्याने लढा दिला.  यात तारापोर हेही जखमी झाले, मात्र ते समोर उभे राहिले.
 
 16 सप्टेंबर 1965 रोजी जस्सोरन पकडले गेले आणि 17 घोड्यांसह तारापोर चाविंडावर हल्ला करण्यासाठी तैनात होते.  या भीषण लढाईत 43 वाहनांसह अतिरिक्त तुकडी मागवण्यात आली होती, परंतु ती न आल्याने हल्ला मागे घेण्यात आला.  तारापोरच्या तुकडीने आपले 9 रणगाडे गमावले, शत्रूचे 60 रणगाडे नष्ट केले, परंतु या युद्धात तारापोर स्वतः शत्रूचे लक्ष्य बनले आणि हौतात्म्य पत्करले.  त्यांच्या पराक्रमासाठी त्यांना परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले.

12. लान्स नायक अल्बर्ट एक्का - 1971
 लान्स नाईक अल्बर्ट एक्का: लान्स नाईक अल्बर्ट एक्का, ज्यांना मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आले, त्यांनी 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात शत्रूंचे दात पाडून अभूतपूर्व शौर्य दाखवले.  3 डिसेंबर 1971 रोजी एक्का यांनी शत्रूंशी लढताना आपल्या देशाचे बलिदान दिले.  या युद्धात पाकिस्तानचा दारुण पराभव झाला.  या युद्धानंतर बांगलादेशचा उदय झाला.  एक्का यांचा जन्म 27 डिसेंबर 1942 रोजी झारखंड (तत्कालीन बिहार) मधील गुमला जिल्ह्यातील डुमरी ब्लॉकमधील जरी गावात झाला.  अल्बर्टची इच्छा सैन्यात भरती होण्याची होती, जी डिसेंबर 1962 मध्ये पूर्ण झाली.  बिहार रेजिमेंटमधून त्यांनी सैन्यात कामाला सुरुवात केली.  तो एक चांगला हॉकीपटूही होता.  प्रशिक्षणादरम्यानच शिस्तप्रिय एक्काला लान्स नायक बनवण्यात आले.
 
 27 डिसेंबर 1942 रोजी झारखंडमधील गुमला जिल्ह्यातील जरी गावात जन्मलेले अल्बर्ट एक्का यांना सुरुवातीपासूनच सैन्यात भरती होण्याची इच्छा होती.  डिसेंबर 1962 मध्ये ते सैन्यात दाखल झाले आणि बिहार रेजिमेंटमध्ये त्यांनी काम सुरू केले.  14 व्या गार्डच्या स्थापनेच्या वेळी अल्बर्टची नंतर बदली करण्यात आली आणि प्रशिक्षणादरम्यान त्याची क्षमता आणि शिस्त लक्षात घेऊन त्याला लान्स नायक बनवण्यात आले.

13. फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखों - 1971
 फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंह सेखॉन यांचा जन्म १७ जुलै १९४३ रोजी पंजाबमधील लुधियाना येथील रुरका गावात झाला.  लग्नानंतर काही महिन्यांनी निर्मलजीत सिंग यांनी स्वतःला देशासाठी समर्पित केले.  14 डिसेंबर 1971 रोजी, श्रीनगर एअरफील्डवर 6 पाकिस्तानी सेबर जेटने हल्ला केला, तेव्हा अधिकारी निर्मलजीत सिंग हे 18 नेट स्क्वाड्रनसह सुरक्षा दलाचे नेतृत्व करत होते.
 
 शत्रूच्या F-86 सेबर जेटचा धैर्याने सामना करत त्यांनी दोन सेबर जेट नष्ट केली.  तो सतत शत्रूच्या मागे लागला आणि षटकार खेचत राहिला.  दुसऱ्या सेबर जेटच्या स्फोटानंतर सेखोनने त्यांचे सहकारी फ्लाइट लेफ्टनंट घुमान सिंग यांना संदेश पाठवला की, कदाचित माझे विमानही लक्ष्यावर आदळले असेल, आता तुम्ही मोर्चा काढा….  हा संदेश दिल्यानंतर ते शहीद झाले.

14. सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल - 1971
 14 ऑक्टोबर 1950 रोजी पूना येथे जन्मलेल्या अरुण खेत्रपाल यांना 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धातील शौर्याबद्दल मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आले.  अरुणची एनडीएमध्ये स्क्वाड्रन कॅडेट म्हणून निवड झाली, त्यानंतर त्याला इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडून येथे वरिष्ठ अंडर ऑफिसर बनवण्यात आले.  १३ जून १९७१ हा दिवस होता तो पूना हॉर्समध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून रुजू झाला.
 
 डिसेंबर 1971 मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धात, अरुण खेत्रपाल 16 डिसेंबर रोजी एका स्क्वॉड्रनचे नेतृत्व करत होते.  मग इतर तुकडीचा निरोप मिळताच तो आपली तुकडी मदतीसाठी घेऊन शकरगडच्या जरपाळकडे निघाला.  या दरम्यान शत्रूचे रणगाडे उद्ध्वस्त करत असताना त्यांचा रणगाडा स्वतः शत्रूच्या निशाण्याखाली आला, मात्र परिस्थितीची गरज लक्षात घेऊन त्यांनी आग लागूनही रणगाड्यापासून दूर न जाता शत्रूला पुढे जाण्यापासून रोखले.  दरम्यान, झटक्याने त्यांची टाकी निरुपयोगी झाली आणि अरुण खेतरपाल शहीद झाले.  अरुण खेत्रपाल हे सर्वात तरुण परमवीर चक्र प्राप्तकर्ते होते.  त्याच्या शौर्याची शत्रूंनाही खात्री पटली.

15. मेजर होशियार सिंग- 1971 (जिवंत)
 मेजर होशियार सिंग हे त्यांच्या हयातीत परमवीर चक्राने सन्मानित झालेल्या शूर सैनिकांपैकी एक होते.  5 मे 1937 रोजी हरियाणातील सोनीपत येथे जन्मलेल्या मेजर होशियार सिंग यांनी 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात शौर्य दाखवले.  तो एक हुशार व्हॉलीबॉल खेळाडू आणि त्याच्या राष्ट्रीय स्तरावरील संघाचा कर्णधार होता.  जाट रेजिमेंटल सेंटरच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने या संघाचा सामना पाहिला तेव्हा तो होशियार सिंगने प्रभावित झाला.  यानंतर, 1957 मध्ये, होशियार सिंग सैन्याच्या जाट रेजिमेंटमध्ये दाखल झाले आणि 3 ग्रेनेडियर्समध्ये कमिशन घेतल्यानंतर ते अधिकारी झाले.
 
 1965 मध्ये पाकिस्तानविरुद्धचा विजय सुकर करण्यात होशियार सिंग यांनी दिलेल्या महत्त्वाच्या माहितीचे विशेष योगदान होते.  1971 मध्ये भारत-पाक युद्धाच्या शेवटच्या दोन तासांपर्यंत, जेव्हा युद्धविराम घोषित झाला आणि दोन्ही सैन्य एकमेकांच्या सैनिकांना संपविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होते, तेव्हा होशियार सिंग जखमी अवस्थेतच राहिले आणि शत्रू एकापाठोपाठ सैनिकांना हटवत राहिले. इतर.  तो आपल्या साथीदारांना प्रोत्साहन देत राहिला.  मेजर होशियार सिंग यांच्या बटालियनने विजय नोंदवला होता.  यासाठी मेजर सिंह यांना परमवीर चक्र प्रदान करण्यात आले.

16. नायक सुभेदार बाना सिंग 1987
 6 जानेवारी 1949 रोजी जम्मू-काश्मीरमधील कडयाल गावात जन्मलेल्या नायब सुभेदार बाना सिंह यांनी 1969 मध्ये लष्करात दाखल होऊन आपल्या लष्करी जीवनाला सुरुवात केली.  सियाचीन आघाडीवर लढताना त्यांनी दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले.  बाणा सिंग यांनी सियाचीन जिंकलेल्या पोस्टचे नंतर बाना पोस्ट असे नामकरण करण्यात आले.
 
 बाणासिंग यांनी सियाचीन ग्लेशियरवर भारतीय सीमेवर पाकिस्तानने बांधलेली कैद चौकी जिंकण्यासाठी अदम्य साहस दाखवले आणि सैनिकांसोबत बर्फाची सपाट भिंत पार करण्यात यश मिळवले, जी पार करणे आतापर्यंत सैनिकांसाठी कठीण काम होते.  बाना सिंग यांनी ते केवळ ओलांडले नाही तर ते ओलांडले आणि पोस्टवर तैनात असलेल्या पाकिस्तानी सैनिकांवर ग्रेनेड आणि बॅनेटने हल्ला करून त्यांना ठार केले.  या पोस्टवर तैनात असलेल्या पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपचे कमांडो मारले गेले आणि बाकीचे फरार झाले.  अशाप्रकारे बाणासिंगच्या शौर्याने सियाचीनवरील चौकी शत्रूने जिंकली.

17. मेजर रामास्वामी परमेश्वरन 1987
 13 सप्टेंबर 1946 रोजी जन्मलेले मेजर रामास्वामी परमेश्वरन 1972 मध्ये भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये दाखल झाले.  श्रीलंका आणि भारत यांच्यातील करारानुसार भारतीय शांतता दलात तो श्रीलंकेत गेला होता.  25 नोव्हेंबर 1987 ची गोष्ट आहे, जेव्हा एका गावात दारूगोळा असल्याची माहिती मिळताच त्यांनी आपल्या बटालियनसह घेराव घातला, परंतु रात्री केलेल्या या शोध मोहिमेत तेथे काहीही सापडले नाही.
 
 परतीच्या वेळी, मंदिराच्या वेषात, शत्रूंनी लष्कराच्या तुकडीवर गोळीबार सुरू केला आणि ते तामिळ वाघांच्या समोर आले.  त्यानंतर शत्रूची गोळी मेजर रामास्वामी परमेश्वराच्या छातीत लागली, पण जखमी होऊनही मेजरने लढा सुरूच ठेवला आणि बटालियनला सूचना दिल्या.  या लढाईत मेजरच्या टीमने 6 दहशतवाद्यांना ठार केले आणि दारूगोळाही जप्त केला, मात्र छातीत गोळी लागल्याने ते मारले गेले.  या शौर्याबद्दल त्यांना परमवीर सन्मान देण्यात आला.

18. कॅप्टन मनोज कुमार पांडे 1999 (कारगिल)
 कॅप्टन मनोज कुमार पांडे यांचा जन्म 25 जून 1975 रोजी उत्तर प्रदेशातील रुधा गावात (सीतापूर) झाला.  मध्यंतरीच्या शिक्षणानंतर, मनोज कुमार राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, पुणे येथे रुजू झाले आणि प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, ते 11 गोरखा रायफल्स रेजिमेंटच्या 1ल्या बटालियनमध्ये कमिशन्ड ऑफिसर म्हणून रुजू झाले.  जेव्हा त्यांची बटालियन सियाचीन येथे तैनात होणार होती, तेव्हा त्यांनी स्वत: आपल्या अधिकाऱ्याला पत्र लिहून सर्वात कठीण दोन चौक्यांपैकी एक, बाना चौकी किंवा पहेलवान चौकी आणि नंतर १९,७०० फूट उंचीवर असलेल्या पेहलवान चौकीची मागणी केली. पण आवेशाने आणि शौर्याने त्यांनी धीर धरला. .
 
 1999 च्या निर्णायक लढाईत, त्यांच्या बटालियनने खालुबर जिंकण्याची जबाबदारी घेतली आणि शत्रूच्या प्रत्येक हल्ल्याला तोंड देत आणि शत्रू सैनिकांचे मृतदेह टाकून शेवटी खालुबार जिंकला.  या विजयाच्या लढाईत त्याच्या खांद्याला आणि पायांना गंभीर दुखापत झाली असली तरी, तरीही त्याने शत्रूचे बंकर उद्ध्वस्त करणे सुरूच ठेवले.  दरम्यान, शत्रूच्या मशीनगनमधून निघालेली गोळी थेट त्याच्या कपाळावर लागली, त्यानंतर तो खाली कोसळला.  त्यांच्या हौतात्म्याने उत्साही झालेले सैनिक शत्रूवर अधिक आक्रमक झाले, त्यामुळे शत्रूचा अंत झाला आणि आमचा विजय झाला.  वयाच्या २४ व्या वर्षी शहीद झालेल्या या शूर सैनिकाला मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आले.

19. कॅप्टन विक्रम बत्रा 1999 (कारगिल)
 कॅप्टन विक्रम बत्रा यांचा जन्म ९ सप्टेंबर १९७४ रोजी पालमपूर येथे झाला.  त्यांनी लहानपणापासून देशभक्तीच्या कथा ऐकल्या आणि शाळेत असताना सैन्याची शिस्त पाहिली, ज्याचा त्यांच्या मनावरही परिणाम झाला.  त्यांनी हाँगकाँगच्या मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी नाकारून देशाची सेवा करण्याला महत्त्व दिले आणि 1996 मध्ये ते CDS द्वारे भारतीय लष्कर अकादमी, डेहराडूनमध्ये रुजू झाले आणि 1997 मध्ये त्यांची 13 जम्मू आणि काश्मीर रायफल्समध्ये लेफ्टनंट म्हणून नियुक्ती झाली.  कमांडो प्रशिक्षणाबरोबरच त्यांनी लष्करी जीवनाचे पुढील प्रशिक्षण घेतले.  1999 मध्ये कारगिल युद्धासाठी त्यांची तुकडी पाठवण्यात आली आणि हंप आणि राकी नॅब जिंकल्यानंतर त्यांना कॅप्टन बनवण्यात आले.  श्रीनगर-लेह रस्त्यावरील 5140 येथे महत्त्वाचे शिखर जिंकल्यानंतर त्यांना 'शेरशाह' आणि 'कारगिलचा सिंह' अशी टोपणनावेही देण्यात आली.
 
 यानंतर त्याची मोहीम ४८७५ शिखर काबीज करण्याची होती ज्यामध्ये तो आपल्या साथीदारांसह पुढे जात होता.  मिशन पूर्ण होण्याच्या जवळ आले होते, जेव्हा तो आपल्या सहकारी लेफ्टनंटला स्फोटापासून वाचवण्यासाठी पुढे गेला आणि त्याच्या छातीत एक गोळी लागली.  यामध्ये लेफ्टनंट नवीन यांच्या दोन्ही पायांना दुखापत झाली असून कॅप्टन बत्रा शहीद झाले आहेत.  या पराक्रमासाठी त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आले.


20. रायफलमन संजय कुमार 1999 (कारगिल) (जिवंत)
 3 मार्च 1976 रोजी हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथे जन्मलेल्या संजय कुमार यांचे लहानपणापासूनच सैन्यात भरती होण्याचे स्वप्न होते.  संजय कुमार 1996 मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाले आणि सुदैवाने सैन्यात दाखल झाल्यानंतर अवघ्या 3 वर्षात त्यांना परमवीर चक्र मिळाले.
 
 ४८७५ फूट उंच शिखरावर शौर्य दाखवणाऱ्या दोन जवानांना परमवीर चक्र प्रदान करण्यात आले, एक कॅप्टन विक्रम बत्रा आणि दुसरा रायफलमन संजय कुमार.
 
 कारगिल युद्धाच्या ऐन मध्यावर ४ जुलै१९९९ रोजी संजय कुमार आपल्या जम्मू काश्मीर रायफल्सच्या १३व्या बटालियनमधील तुकडीचे नेतृत्त्व करीत एरिया फ्लॅट टॉप या भागाची टेहळणी करीत होते. पाकिस्तानी सैनिकांच्या ताब्यात असलेल्या या ठिकाणी जाण्यासाठी संजय कुमार कडा चढून गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की तेथील पाकिस्तानी ठाण्यावर मोठी कुमक होती. नंतर होऊ घातलेल्या जम्मू काश्मीर रायफल्सच्या आक्रमण या ठाण्याने सहज कापून काढले असते. हे पाहून ते एकटे कड्यावरुन पुढे सरकले आणि ठाण्याच्या एका बाजूस जाउन त्यांनी एकांडा एल्गार केला. ते पाहताच पाकिस्तान्यांनी त्यांच्यावर मशिनगनचा मारा केला. पहिल्या काही पावलांतच संजय कुमार यांच्या हातावर आणि छातीत गोळ्या घुसल्या. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांनी शत्रूचे बंकर गाठले आणि तीन पाकिस्तानी सैनिकांना हातोहातच्या लढाईत यमसदनी धाडले. यानंतर त्यांनी तेथील एक मशिनगन उचलली आणि शत्रूच्या दुसऱ्या बंकरकडे गेले. अचानक आलेल्या या हल्ल्याने गांगरुन गेलेले पाकिस्तानी सैनिक काही करण्याच्या आत संजय कुमारांनी त्यांना ठार मारले. हे पाहून चवताळलेल्या भारतीय सैनिकांच्या प्लाटूनने हल्ला चढवला आणि उरलेल्या पाकिस्तानी सैनिकांना ठार करीत आणि पळवून लावीत एरिया फ्लॅट टॉप काबीज केला.

संजय कुमार यांच्या अतुलनीय पराक्रमासाठी त्यांना परमवीर चक्र देण्यात आले.


सुरुवातीचे जीवन

कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांचा जन्म 10 मे 1980 रोजी उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील औरंगाबाद अहिर गावात लष्करी कुटुंबात झाला . त्यांचे वडील राम करणसिंग यादव यांनी कुमाऊँ रेजिमेंटमध्ये 1965 आणि 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात भाग घेतला होता . 1962 च्या भारत-चीन युद्ध आणि 1965 आणि 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या कथा ऐकत मोठे झालेले दोन्ही भाऊ भारतीय सैन्यात दाखल झाले, त्यांचा मोठा भाऊ जितेंद्र सिंह यादव हे देखील लष्कराच्या तोफखाना शाखेत आहेत. यादव वयाच्या 16 वर्ष 5 महिन्यांत भारतीय सैन्यात भरती झाले होते. त्याचा लहान भाऊ एका बहुराष्ट्रीय कंपनीत कामाला आहे.

लष्करी जीवन

ग्रेनेडियर यादव 18 ग्रेनेडियर्ससह कमांडो प्लाटून 'घटक' चा भाग होता , ज्याला 4 जुलै 1999 च्या पहाटे टायगर हिलवरील तीन रणनीतिक बंकर काबीज करण्यासाठी नियुक्त करण्यात आले होते. बंकर एका उभ्या, बर्फाच्छादित 1000-फूट-उंच चट्टानच्या वर स्थित होते. भविष्यात गरज पडण्याची शक्यता असल्याने यादव यांनी स्वेच्छेने कड्यावर चढून दोर बसवले. अर्ध्या वाटेने, शत्रूच्या बंकरने मशीन गन आणि रॉकेट गोळीबार केला, ज्यामुळे प्लाटून कमांडर आणि इतर दोघांचा मृत्यू झाला. घशात आणि खांद्यावर तीन गोळ्या लागल्या असतानाही यादवने उर्वरित 60 फूट चढून माथा गाठला. गंभीर जखमी असूनही, त्याने पहिल्या बंकरमध्ये घुसून चार पाकिस्तानी सैनिकांना ग्रेनेडने ठार केले आणि शत्रूला चकित केले, बाकीच्या प्लाटूनला कड्यावर चढण्याची संधी दिली.

यानंतर यादवने आपल्या दोन सहकारी सैनिकांसह दुसऱ्या बंकरवर हल्ला केला आणि हाताशी असलेल्या लढाईत चार पाकिस्तानी सैनिकांना ठार केले. त्यामुळे टायगर हिल काबीज करण्यात प्लाटूनला यश आले.

ग्रेनेडियर यादव यांना परमवीर चक्र मरणोत्तर घोषित करण्यात आले , त्यामुळे त्यांच्याच नावाचा त्यांच्याच युनिटमधील आणखी एक सैनिक योगेंद्र सिंह यादव हे त्यांच्याच शेजारच्या मेरठ जिल्ह्यात असलेल्या टायगर हिल मेेरठ चे योगेंद्र सिंह यादव यांना सेना पदक मिळाले आहे तर परमवीर चक्र मिळालेले बुलदंशहरचे योगेंद्र सिंह यादव जिवंत असून त्यांची प्रकृती दिल्लीच्या आर्मी रेफरल हॉस्पिटलमध्ये सुधारत आहे. त्यानंतर लष्करप्रमुख जनरल व्ही. पी. मलीक तेेेथे पोहोचले आणि त्यांनी योगेंद्र सिंह यांना देशातील सर्वात मोठ्या लष्करी पुरस्काराबद्दल माहिती दिली आणि त्यांचे अभिनंदन केले.

कारगिल युद्धात मोक्याच्या टायगर हिल शिखरावर विजय मिळवण्याच्या अनुकरणीय भूमिकेबद्दल, शत्रूच्या 17 गोळ्यांचा जीव धोक्यात घालूनही अदम्य धैर्य दाखविल्याबद्दल भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले . कॅप्टन योगेंद्र सिंह यादव हे परमवीर चक्र प्राप्त करणारे देशातील सर्वात तरुण सैनिक आहेत . कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांना टायगर हिलचा वाघ म्हटले जाते. तो अमिताभ बच्चन यांच्या खास आमंत्रणावरून त्याचे सहकारी परमवीर चक्र विजेते सुभेदार संजय कुमार यांच्यासोबत कौन बनेगा करोडपती या शोमध्ये सामील झाला आणि जिंकलेली संपूर्ण रक्कम आर्मी वेल्फेअर फंडला दान केली. यश भारती , 2014 मध्ये उत्तर प्रदेश सरकारचा देशाच्या सेवेसाठी राज्याचा सर्वोच्च पुरस्कार .पुरस्कार देण्यात आला आहे. 

                  जयहिंद!

सदर माहिती ही गुगल च्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे. 



Saturday, 27 November 2021

 26/11 हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

     श्रद्धांजली वाहून गप्प बसने चालनार नाही. देशासाठी, आपल्या प्रत्येकासाठी या हुतात्मा पोलिस, सैनिक व जवान यांनी प्राण त्यागले आहेत. आपली नैतिक जबाबदारी ओळखून जाती धर्माच्या चौकटिच्या बाहेर पडून विचार करून आपल्याला या सैनिक, पोलिस व देशासाठी काय करता येईल ते पहाणे गरजेचे आहे. आम्ही जयहिंद फाऊंडेशनच्या माध्यमातून सैनिक, पोलिस व समाजासाठी अतुलनीय साहस दाखवतात त्यांच्या साठी कार्य करत असताना माझ्या प्रत्येक देश बांधवाला देशाचे या समाजाचे आपण देने लागतो, व म्हणून मी माझा जो पण जात धर्म आहे त्याचे पालण मी माझ्या घरात करेन पण जेव्हा मी घराचा उंबरा ओलांडून बाहेर पडेन त्यावेळी भान ठेवेन कि मी या महान देशाचा  महान व जबाबदार नागरिक आहे. मी अशी कोणतीही कृती करनार नाही कि जेणे करून माझ्या देशाला व देशवासीयांना हाणीकारक ठरेल.....

          देशासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्मा जवानाला वाटले पाहिजे कि हे माझे  देश बांधव आहेत, व यांच्यासाठी मी बलिदान देऊन चूक केली नाही हि भावना महत्वाची समजून प्रत्येकाने कार्य करणे गरजेचे आहे.  

                श्री बिपीन मोघे

        राष्ट्रीय संचालक-जयहिंद फाऊंडेशन


Wednesday, 1 May 2019

*मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा* 🚩🇮🇳 जयहिंद मित्रांनो जयहिंद, आज ०१ मे अर्थात महाराष्ट्र दिन , या दिवसाची महती, महत्व आणि माहिती आपल्या सर्वांना असणारच यात दुमत नाही.... या महा - राष्ट्रच्या निर्मिती साठी अनेकांनी आपले प्राण वाहिले आणि या महान अर्थात महा राष्ट्राची निर्मिती झाली.... आणि पुढे अनेकांनी या महाराष्ट्राला महान करण्यासाठी आपले आयुष्य वेचले, कोणी आबाद होऊन तर कोणी नाबाद राहून आपल्या महाराष्ट्रला घडवलं आणि देशातच नव्हे तर जगात एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. मित्रांनो ईतिहास साक्षी आहे, देशाच्या प्रतिकूल परिस्तिथी मध्ये देशाला दिशा देण्याचं काम हे, एक पाऊल पुढे टाकत, या महाराष्ट्राने नेहमीचं केलं होत, आज हि करत आहे, आणि उद्या हि करत राहणार आहे... *कारण हा महाराष्ट्र आहे कणखर मनांचा, निधड्या छातीचा, आणि शूर वीरांचा...*. आज देखील या अखंड महाराष्ट्राच्याचं नव्हे तर अजिंक्य भारतासाठी महाराष्ट्रतून आपले अनेक शूर मावळे भारतीय संरक्षण दलात, आपल्या जीवाची पर्वा न करता आपली बहादुरी आणि शूरगिरी गाजवत आहेत...अशा या शूर, बहादूर आणि जिगरबाज सैनिकांना आजच्या महाराष्ट्र दिनी, जयहिंद फाऊंडेशनचा मानाचा मुजरा.... *मित्रांनो आपल्या या महा-राष्ट्रातील अशाच १४ जवानांनी आपल्या जीवाची तर सोडाच पण त्यांच्यावर ज्यांचा जीव आहे ते माता पिता, धर्मपत्नी आणि ती छकुली आणि छकुला यांचा देखील विचार न करता आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्या १४ हुतात्मा जवानांच्या कुटुंबाचा सन्मान सोहळा रविवार दिनांक ०५ मे २०१९ रोजी सकाळी ९ वाजता , वासुदेव बळवंत फडके सभागृह, पनवेल येथे आयोजित केला आहे....* *तेव्हा मित्रांनो या खऱ्या खुऱ्या बाजीगारांच्या कर्तृत्वाची आणि आपल्या देशाच्या खऱ्या हिरोंच्या बलिदानाची,त्यागाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, तमाम महाराष्ट्र वासीयांना आजच्या या पवित्र महाराष्ट्र दिनी जयहिंद फाऊंडेशन आपल्याला आग्रहाचे निमंत्रण देत आहे. आणि आपण सगळे नक्की येणार आहात कारण हा महाराष्ट्र माझा आहे आणि मी या महाराष्ट्राचा आहे आणि म्हणूनच मी, तुम्ही आणि आपण सर्व एका सुरात सूर मिळऊन म्हणणार आहोत.* *जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा.* जयहिंद फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य, (सैनिक हो तुमच्यासाठी) अध्यक्ष वर्धा जिल्हा बिपीन मोघे 9421726268

फक्त जयहिंद बोललं म्हणजे झाले का?

*फक्त जयहिंद बोललं म्हणजे झालं का* ? 🇮🇳 जयहिंद मित्रांनो जयहिंद, मित्रांनो किती साधा आणि सोपा शब्द आहे हा बोलायला, आपण सहज बोलतो जयहिं...